Water Palaces of India: पाण्यावर तरंगणारे भारताचे हे 5 राजमहाल, एकदा जाऊन पाहाच…

भारतात अनेक राजवाडे आणि अद्वितीय स्थापत्यकलेसाठी तसेच नयनरम्य परिसरासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. काही राजवाडे हे तलाव आणि नद्यांच्या मध्यभागी दिमाखात उभे आहेत. ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असल्यासारखे भासतात. म्हणूनच त्यांना 'जलमहाल' म्हणतात. भारतातील या पाच सर्वात सुंदर जलमहालांबद्दल जाणून घेऊयात...

| Updated on: Jul 17, 2026 | 7:19 PM
1 / 5
जहाज महल (Mandu, Madhya Pradesh) - मध्यप्रदेशातील  ऐतिहासिक शहर मंडूमध्ये मुंज तलाव आणि कपूर तलाव दरम्यान स्थित जहाज महल कपूर तलावात दरम्यान जहाज महल एक अनोखे जल इमारत आहे. विशेषत: १५ व्या शताद्बीमध्ये निर्मित या महलाची वास्तू दोन तलावाच्या दरम्यान पाण्यात तरंगत्या एखाद्या विशाल जहाजासारखे दिसते.

जहाज महल (Mandu, Madhya Pradesh) - मध्यप्रदेशातील ऐतिहासिक शहर मंडूमध्ये मुंज तलाव आणि कपूर तलाव दरम्यान स्थित जहाज महल कपूर तलावात दरम्यान जहाज महल एक अनोखे जल इमारत आहे. विशेषत: १५ व्या शताद्बीमध्ये निर्मित या महलाची वास्तू दोन तलावाच्या दरम्यान पाण्यात तरंगत्या एखाद्या विशाल जहाजासारखे दिसते.

2 / 5

जग मंदिर (Udaipur, Rajasthan)- पिछोला तलावाच्या दक्षिण बेटावर असलेले जग मंदिर एक अन्य भव्य जलमहल आहे. विशेषत: 'लेक गार्डन पॅलेस'च्या नावाने प्रसिद्ध या महलाची निर्मिती १६ व्या आणि १७ व्या शतकातील मेवाडच्या राजांनी केली होती. येथे सुंदर बगीचे,दगडी कोरीव काम आणि घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे.

3 / 5

ताज लेक पॅलेस (Udaipur, Rajasthan) - राजस्थानच्या उदयपुर येथील पिछोला तलावातील निळाशार पाण्यात ताज लेक पॅलेस आपल्या सुंदरतेसाठी ओळखले जाते. विशेषत: पांढऱ्या संगमरवरी बनलेल्या या महालाची निर्मिती १७४३ मध्ये महाराणा जगत सिंह द्वितीयद्वारा शाही ग्रीष्मकालिन विश्राम स्थळाच्या रुपात केले होता. सध्या याचे रुपांतर एका लक्झरी हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.

4 / 5

जल महल (Jaipur, Rajasthan)- अरावली हिरव्या डोंगररांगात मानसागर तलावात उभे आहे. जयपूरचा जल महल भारताच्या सर्वात प्रतिष्ठीत जलमहलापैकी एक आहे. १८ व्या शतकातील या पाच मजली इमारतीचे चार मजले नेहमी पाण्यातच बुडालेले असतात. जेव्हा हा तलाव संपूर्ण भरतो, तेव्हा केवळ एक मजला दिसतो.जो पाण्यावर तरंगते महलाचा एक अद्भुत भ्रम निर्माण करतो.

5 / 5

नीर महल (Melaghar, Tripura)- त्रिपुराची राजधानी अगरतलापासून ५३ किमी दूरवर रुद्रसागर तलावाच्या शांत पाण्यात नीर महल ( अर्थात जल महल ) उभे आहेत. विशेषत:१९३० महाराजा वीर विक्रम किशोर माणिक्य बहादुरद्वारा निर्मित पूर्वोत्तर भारतातील सर्वात मोठे जलमहल आहे. हे नीर महल हिंदू आणि मुगल शैलीतील एक शानदार मिश्रण पाहायला मिळते. Tripura

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us