AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आई वडीलांनी मुलांना या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. पालकांनी मुलांचं संगोपन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : आई वडीलांनी मुलांना या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत, चाणक्य काय म्हणतात?
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 17, 2026 | 7:05 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार हे झालेच पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार केले नाहीत  तर ते वाईट मार्गाला देखील लागू शकतात. आर्य चाणक्य म्हणतात मुलं ही चिखलाच्या गोळ्या सारखी असतात, जसं एक कुंभार चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर अशी भांडी तयार करतो, त्याचप्रमाणे आई-वडिलांनी देखील आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत.  जर मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार झाले तर ही मुलं भविष्यात कुटुंबाचा तर आधार बनताच परंतु अशा मुलांमुळे त्या राज्याचा देखील विकास होत असतो. सशक्त, निरोगी आणि बुद्धिवान तरुणांची  पिढी ही कोणत्याही देशाची संपत्ती असते. याच तरुणाच्या जीवावर देशाचा डोलारा उभा राहतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मोठ्याचा आदर – चाणक्य म्हणतात आपल्यापेक्षा जी लोक वयाने मोठी असतात, त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा प्रचंड असतो. त्यांनी जग जवळून पाहिलेलं असतं. त्यामुळे कोणत्यावेळी काय निर्णय घ्यायचे आणि कोणत्या परिस्थितीला कसं तोडं द्यायचं हे त्यांना चांगलं माहिती असतं, त्यामुळे अशा लोकांचा आदर केला गेला पाहिजे. आपल्या मुलांवर तसे संस्कार आई-वडिलांनी करावेत असं चाणक्य म्हणतात.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय पर्याय नाही, प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना कष्ट करायला शिकवलं पाहिजे. कष्टाचं महत्त्व त्याच्या लक्षात आणून द्यावं, मुलं आळशी बनता कामा नये. जर मुलं आळशी बनलं तर संपूर्ण कुटुंबाचा नाश होऊ शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिक्षणाचं महत्त्व – आई -वडिलांनी मुलांना चांगलं शिक्षण देणं हे कुठल्याही आई-वडिलांचं कर्तव्य आहे. त्यामुळे मुलांना शिक्षणाचं महत्त्व लक्षात आणून देणं ही आई वडिलांची जबाबदारी आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा