भारतातील’या’ जिल्ह्यात आहेत सर्वात जास्त रेल्वे स्थानके, 99 टक्के लोकांना नाव देखील माहित नाही
दररोज लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असतात. पण अनेकांना माहिती नाही की देशातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त रेल्वे स्टेशन आहेत. नाव ऐकून तुम्हाला देखील बसणार नाही विश्वास.

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानले जाते. देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणारे हे विस्तीर्ण जाळे दररोज कोट्यवधी प्रवाशांना सेवा देत असून, रेल्वेच्या विकासाबरोबरच अनेक रंजक आणि कमी परिचित माहितीही वेळोवेळी समोर येत असते.

अशातच देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तरही तितकेच उत्सुकता वाढवणारे आहे.

देशभरात दररोज सुमारे 13500 हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. याशिवाय 9 हजारांपेक्षा अधिक मालगाड्या देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक व्यवस्थेला गती देण्याचे काम करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेल्वे वाहतुकीचे व्यवस्थापन हे भारतीय रेल्वेचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते.

रेल्वे स्थानकांच्या संख्येबाबत बोलायचे झाल्यास, विविध उपलब्ध आकडेवारीनुसार 2025 पर्यंत भारतात सुमारे 7300 ते 8000 दरम्यान रेल्वे स्थानके कार्यरत आहेत. या विस्तीर्ण रेल्वे जाळ्यामुळे देशातील दुर्गम भागही रेल्वेमार्फत जोडले गेले आहेत.

राज्यानुसार पाहिले असता, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य आहे. या राज्यात 1200 हून अधिक रेल्वे स्थानके असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्याच्या नावावर देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेल्या जिल्ह्याचा मान असल्याचे विविध आकडेवारीत दिसून येते. या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने प्रयागराज जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.