
भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताची सीमा अनेक देशांशी आहे. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी जोडलेली आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.

भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये आहेत ज्यांची सीमा ही 3 देशांना लागून आहे. त्यामुळे ही राज्ये खास आहेत.

सिक्कीमची पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळशी सीमा आहे. सिक्कीम हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य असून हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

पश्चिम बंगालची सीमा उत्तरेला भूतान, ईशान्येला बांगलादेश आणि वायव्येला नेपाळशी लागून आहे. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे.

अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेस म्यानमार, पश्चिमेस भूतान आणि उत्तरेस चीनशी सीमा आहेत. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे.