वायरलेस की वायर्ड? तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीसाठी बेस्ट काय?
वायरलेस चार्जिंग वापरणे सोपे असले तरी ते फोनसाठी किती सुरक्षित आहे? बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि फोन गरम होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याची सोपी माहिती.

आजकाल केबलशिवाय फोन चार्ज करण्याची म्हणजेच वायरलेस चार्जिंगची खूप क्रेझ आहे. हे तंत्रज्ञान दिसायला खूप आधुनिक वाटत असले, तरी त्याचे काही तोटेही आहेत. ही पद्धत तुमच्या फोनसाठी नक्की कशी काम करते, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

वायरलेस चार्जिंग करताना फोन आणि चार्जिंग पॅड दोन्ही गरम होतात. केबलने चार्ज करण्यापेक्षा यामध्ये ३० टक्क्यांपर्यंत ऊर्जा वाया जाते आणि तिचे रूपांतर उष्णतेत होते. सततची उष्णता बॅटरीचे आयुष्य कमी करते.

वायर्ड चार्जरच्या तुलनेत वायरलेस पद्धतीने फोन खूप उशिरा चार्ज होतो. केबलद्वारे मिळणारी वीज थेट बॅटरीपर्यंत पोहोचते, पण वायरलेसमध्ये ऊर्जेचा अपव्यय जास्त होतो.

चार्जिंग पॅडमध्ये एक कॉइल असते जी चुंबकीय क्षेत्र तयार करते. जेव्हा तुम्ही फोन त्यावर ठेवता, तेव्हा फोनमधील दुसरी कॉइल ती ऊर्जा खेचून घेते आणि बॅटरी चार्ज करते. या प्रक्रियेत फोन योग्य ठिकाणी ठेवला नाही, तर तो अधिकच गरम होतो.

त्यामुळे वायरलेस चार्जिंग नेहमी वापरू नका. जर घाई असेल तरच वायरलेस चार्जिंग वापरा. एरवी केबलनेच फोन चार्ज करणे बॅटरीसाठी चांगले असते. चार्ज करताना फोनचे कव्हर काढल्यास उष्णता साचून राहत नाही.

चार्जिंग सुरू असताना गेम खेळणे किंवा व्हिडीओ पाहणे टाळा. बॅटरी दीर्घकाळ टिकवण्यासाठी ती पूर्ण १०० टक्के चार्ज करण्याऐवजी ८० टक्क्यांपर्यंतच चार्ज करणे फायदेशीर ठरते. वायरलेस चार्जिंग सोयीचे असले तरी, फोनच्या बॅटरीला दीर्घकाळ सुस्थितीत ठेवण्यासाठी आजही जुनी पद्धतच सर्वात उत्तम आहे.