AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातकणंगलेत 459 मते जादा निघाली, राजू शेट्टींची निवडणूक आयोगाकडे तक्रार

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीदरम्यान 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ माजली असून पुन्हा एकदा ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त केला जात आहे. राजू शेट्टी यांनी या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले, “हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण […]

हातकणंगलेत 459 मते जादा निघाली, राजू शेट्टींची निवडणूक आयोगाकडे तक्रार
| Updated on: May 31, 2019 | 9:54 AM
Share

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीदरम्यान 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ माजली असून पुन्हा एकदा ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त केला जात आहे.

राजू शेट्टी यांनी या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले, “हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण 12 लाख 45 हजार 797 मतदान झाले होते. मात्र, मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये 12 लाख 46 हजार 256 मते मोजली गेली. याप्रमाणे झालेल्या मतदानापेक्षा एकूण 459 मते जादा झाली आहेत.” यामध्ये पोस्टलची मते धरलेली नसल्याचेही राजू शेट्टी यांनी नमूद केले.

दरम्यान, दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. 5 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या माने घराण्यातील धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढत शेट्टींचा पराभव केला. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक कोल्हापूर आणि दुसरा हातकणंगले. हातकणंगले मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमध्ये 70.28 टक्के इतकं मतदान झालं होतं. मात्र 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2 टक्के मतदान कमी झाले होते. 2014 मध्ये याठिकाणी 72.09 टक्के इतकं मतदान झालं होतं.

हातकणंगले लोकसभा अंतिम निकाल

  • झालेलं मतदान : 12,26,923
  • मोजलेलं मतदान: 12,26,923
  • धैर्यशील माने (शिवसेना) : 5,74,077
  • राजू शेट्टी ( स्वा. शेतकरी संघटना): 4,80,292
  • वंचित : 1,20,584
  • धैर्यशील माने 93,785 मतांनी विजयी

या लढतीला महत्व का आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख मिळवली. त्यामुळं त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठिशी उभा केली होती. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली. त्याचा फटका थेट सरकारलादेखील बसला. त्याविरोधात धैर्यशील माने यांनीही शेतकरी, तरुण, व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेत निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यामुळं एक मुरब्बी राजकारणी विरुद्ध तरुण तडफदार उमेदवार असं चित्र याठिकाणी पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Follow Us
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.