AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray on Eknath Shinde : ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंचं पुन्हा शिंदे गटावर टीकास्त्र

आज दिवसभरातून दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे गटावर आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे हे नेहमीच मैदानात आहेत,'

Aaditya Thackeray on Eknath Shinde : ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंचं पुन्हा शिंदे गटावर टीकास्त्र
आदित्य ठाकरेImage Credit source: TV9
| Updated on: Jul 10, 2022 | 2:00 PM
Share

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी ही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटावर केली आहे. यावरुन पुन्हा एकदा शिंदे आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद उफाळून आल्याचं दिसतंय. आज दिवसभरातून दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे गटावर आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे हे नेहमीच मैदानात आहेत,’  असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत. तर याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधलाय. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत हे दोन्ही नेते वारंवार एकनाथ शिदे गटाला लक्ष करताना दिसत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा पाठित खंजीर खुपसल्याचा उल्लेख केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधलाय. यावेळी ते म्हणाले की, शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे नेहमी मैदानातच आहेत.  ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारं सदैव खुली असतील,’ असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

स्थगिती सरकार-ठाकरे

आज आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर दुसऱ्यांदा निशाणा साधलाय. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना स्थगिती सरकार असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, ‘ हे सरकार पण स्थगिती सरकार होणार का, असा सवाल करत ‘ते आमच्यावर टीका करायेच, आज तेच कामांना स्थगिती देत आहेत,’ असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

शिंदे गटाला सुनावलं

सकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला सुनावताना म्हटलं की, ‘माझ्यावर खास प्रेम करण्याची त्यांना गरज नाही. अन्यथा त्यांनी आमच्या पाठित खंजीर खूपसला नसता. शिवसेना ही आपली आहे आणि चिन्हही आपलेच आसणार आहे,’ असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

Follow Us
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु - फडणवीस
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु - फडणवीस.
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले?
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले?.
दिवंगत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
दिवंगत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.