AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही’, आदित्य ठाकरे मुंबईतील वज्रमूठ सभेत कडाडले

"आत्तापर्यंत जी काही सरकार पाहिली होती त्यांनी कधी मुंबईला झुकवण्याचं काम केलं नाही, मुंबईला मोडण्याचा काम केलं नव्हतं. पण या सरकारचा स्पष्ट मनसुबा आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून मोडायचं", असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

'महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही', आदित्य ठाकरे मुंबईतील वज्रमूठ सभेत कडाडले
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 01, 2023 | 7:26 PM
Share

मुंबई :  छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वर्जमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वात आधी या सभेला संबोधित केलं. यावेळी मुंबई दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे कडालले.

“सभा सुरू व्हायच्या आधी मी प्रेसला देखील विनंती करेन की तिकडच्या खुर्ची भरायच्या आहेत. अजून लोक येत आहेत. नाहीतर आपली थोडी गडबड आपली होईल, आपल्याला वाटेल की ही गद्दारांची सभा आणि म्हणून खुर्च्या मोकळे राहिल्या. आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या राहत नाहीत”, असा पहिला टोला आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात लगावला.

“आत्तापर्यंत जी काही सरकार पाहिली होती त्यांनी कधी मुंबईला झुकवण्याचं काम केलं नाही, मुंबईला मोडण्याचा काम केलं नव्हतं. पण या सरकारचा स्पष्ट मनसुबा आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून मोडायचं. मुंबईला दिल्ली समोर झुकवायचं आहे. मी इशारा देतो, तुम्ही आम्हाला झुकवायला निघालात तर हा महाराष्ट्र तुम्हाला मोडेल पण वाकणार नाही. झुकणार नाही”, अशा शब्दांत आदित्य ठाकर गरजले.

आदित्य ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

“आम्ही सगळे जनतेतले लोक आहोत आणि आपण बघताय की समोरची सगळी जनता आलेली आहे. नागरिक आलेले आहेत. इथे मला कुठच्याही पक्षाचा भेदभाव दिसत नाही धर्माचा भेदभाव दिसत नाही. जातीचा भेदभाव दिसत नाही. इथे आम्ही सगळे संविधान रक्षक म्हणून एकत्र आलेलो आहोत. सगळे संविधान रक्षक माझ्यासमोर बसलेले आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“खरंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली. नागपूर मध्ये झाली. आजची तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. जेव्हा महाविकास आघाडीच्या सभा कुठे कुठे करायच्या हे ठरत होतं तेव्हा मी हट्ट धरला की 1 मे ची सभा ही आपल्या मुंबईत झाली पाहिजे. ही सभा महाराष्ट्राच्या राजधानीत झाली पाहिजे आणि तशी आज सभा होतेय”, असं ठाकरे म्हणाले.

“मुंबई ज्यांच्या ज्यांच्या बलिदानामुळे मुंबई ही महाराष्ट्र सोबत राहिली आणि संयुक्त महाराष्ट्र राहिला त्यांच्या सगळ्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. संयुक्त महाराष्ट्राची आठवण जी आहे ती फार महत्त्वाची आणि ती आठवण ठेवून आपल्या पुढचं कार्य करणे ही खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र दिन साजरा झालाच पाहिजे पण आज महाराष्ट्र जर आपण पाहिला तर गेल्या नऊ-दहा महिन्यांमध्ये अंधारात गेलेला आहे. हा महाराष्ट्र याच्यातून आपल्याला बाहेर काढायचा आणि सुवर्ण काळाकडे न्यायचा आहे”, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं