AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाचा मराठी बाणा, कंगनाला सॉलिड टोला

कंगनाला अजिबात उत्तर देणार नाही. कंगनावर गरजेपेक्षा जास्त बोललं गेलं आहे. आता बोलायची गरज नाही, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाचा मराठी बाणा, कंगनाला सॉलिड टोला
| Edited By: | Updated on: Dec 01, 2020 | 8:43 PM
Share

मुंबईअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मंगळवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधलं. मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. आज अखेर त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या कंगनाच्या टीकेला आता यापुढे शिवसेनेतर्फे उत्तर देतील, अशी चर्चा होती. मात्र ‘मी अजिबात कंगनाला उत्तर देणार नाही. याअगोदरच तिच्यावर गरजेपेक्षा जास्त बोललं गेलंय’, असं पक्षप्रवेशानंतर त्यांनी म्हटलंय. (Actress Urmila Matondkar Statement On kangana Ranaut After join Shivsena)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत सामिल करुन घेतलं. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडली. याच पत्रकार परिषदेत त्यांना कंगनाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कंगनाला टोला लगावत तिने केलेल्या टीकेला अजिबात उत्तर देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

“कंगनाला अजिबात उत्तर देणार नाही. कंगनावर गरजेपेक्षा जास्त बोललं गेलं आहे. आता बोलायची गरज नाही. टीका करायला लोकशाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कंगनाला उत्तर देण्यासाठी मुलाखत दिली नव्हती. त्या मुलाखतीचा तो एक भाग होता. बोलण्याच्या ओघात तसंच प्रश्नही कंगनाबाबत विचारला गेला. त्यामुळे तिच्यावर जास्त बोललं गेलं”, असं उर्मिला म्हणाल्या.

शिवसेनेने तुमच्यावर कोणती नवी जबाबदारी टाकली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. माझ्या इथून पुढच्या राजकीय कारकीर्दीत मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीन, लोकनेता होण्याचा प्रयत्न करीन”.

“शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे. मला शिवसेनेचा भाग झाल्याचा आनंद आहे. मुंबईत महाराष्ट्र आणि जगभरातून असंख्य मुली येतात. त्यांचे आई-वडील अत्यंत आत्मविश्वासाने पाठवतात की, आमच्या मुली मुंबईत सुखरुप आहेत. मला अत्यंत आनंद आणि अभिमान हे की त्या मुंबई शहराचा मी भाग आहे. महिला सुरक्षेबाबतचे अनेक समस्या आहेत. त्यासाठी मला काम करायचे आहे”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

“मला विधानपरिदेचे सदस्यत्व अजून दिलेलं नाही. ते देतील तेव्हा देतील. शिवसेनेने माझं नाव सूचवलं आहे. मला तुम्हाला नम्रपणे सांगायला आवडेल की, मला पक्षप्रवेशाची कोणतीही सक्ती नव्हती. मला काम करायची इच्छा असल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे, असंही सांगायला उर्मिला विसरल्या नाहीत.

(Actress Urmila Matondkar Statement On kangana Ranaut After join Shivsena)

संबंधित बातम्या

Urmila Matondkar LIVE | मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू : उर्मिला मातोंडकर

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.