AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगल्यांचं वाटप झालं खाते वाटपाचं काय? पालकमंत्रीपद अजूनही रिक्तच; पुन्हा शिंदे,फडणवीस आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर

राज्यातील मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालं, मात्र अद्यापही खाते वाटप होत नाही. पालकमंत्रीपदे अजूनही रिक्तच असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

बंगल्यांचं वाटप झालं खाते वाटपाचं काय? पालकमंत्रीपद अजूनही रिक्तच; पुन्हा शिंदे,फडणवीस आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2022 | 1:48 PM
Share

पुणे : आज अनंत चतुर्दशी आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष दिसून येत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज पुणे (pune) दौऱ्यावर आहेत. पुण्यातील उत्सव पहाण्यासाठी ते शहरात आले आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे (Eknath Shinde), फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालं, मात्र अद्यापही खाते वाटप होत नाही. पालकमंत्रीपदे अजूनही रिक्तचं असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

नेमकं काय म्हटलं आदित्य ठाकरेंनी?

आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात मंत्र्यांना बंगल्याचं वाटप होतं, मात्र अद्यापही खाते वाटप झालं नाही. जिल्हे पालकमंत्र्यांविनाच असल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिंदे, फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून अनेकदा आता सणोत्सव हे निर्बंधमुक्त वातावरणात पार पडत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी यावरून देखील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

कोरोना काळात जशी परिस्थिती होती तसे निर्णय घेण्यात आले. राज्यात निर्बंध लावल्यामुळेच आपण अनेकांचे जीव वाचू शकलो, नाहीतर महाराष्ट्रात देखील इतर राज्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असती. कोणत्याही धर्मात लोकांचा जीव वाचवण्याची शिकवण मिळते असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

याकूब मेमनवर प्रतिक्रिया टाळली

सध्या राज्यात याकूब मेमनचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले. यावर मी कालच प्रतिक्रिया दिल्याचे त्यांनी म्हटंले. याकूब मेमनच्या कबरीशी महापालिका किंवा शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी बुधवारी म्हटलं होतं.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.