AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Politics : शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही गळती?, दोन आजी-माजी आमदार फडणवीसांच्या भेटीला; चर्चा तर होणारच!

गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगलेली होती. सत्तांतरानंतर चर्चा अधिक जोर धरु लागल्याने पाटील हे भाजपात सहभागी होणारच असेच वातावरण निर्माण झाले होते. असे असतानाच बबनदादा शिंदे आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने आता भाजपात प्रवेश करुन या चर्चांना ते पूर्णविराम देणार का हे पहावे लागणार आहे.

Politics : शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही गळती?, दोन आजी-माजी आमदार फडणवीसांच्या भेटीला; चर्चा तर होणारच!
राजन पाटील आणि आ. बबनदादा शिंदे
| Updated on: Jul 25, 2022 | 1:25 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Maharashtra Politics) राज्याचे राजकारण हे केवळ (Shiv Sena) शिवसेना, शिंदे गट आणि भाजप पक्षापर्यंतच मर्यादित होते. पण आता नवा ट्विस्ट यामध्ये आला आहे. शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसाकाठी वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीलाही गळती लागणार हे पहावे लागणार आहे. कारण माढ्याचे आ. बबनदादा शिंदे आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत्या पण आता भेट घेतल्यानंतर प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार का हे पहावे लागणार आहे. राजन पाटील हे माजी आमदार तर बबनदादा शिंदे हे माढा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या या भूमिकेनंतर सोलापूरच्या राजकारणाचे चित्र काय समोर येणार हे पहावे लागणार आहे.

दिल्लीत भेटीगाठीचे सत्र सुरु

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारीवर आहेत. या दरम्यानच्या काळातच महाराष्ट्र सदनामध्ये राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठीता सिलसिला सुरु झाला आहे. शपथविधी सोहळा पार पडताच जालन्याचे अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. असे असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघाचे आ. बबनदादा शिंदे आणि माजी आ. राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे दोन राष्ट्रवादीचे नेते आता भाजपात प्रवेश करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चर्चेला मिळणार का पूर्णविराम ?

गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगलेली होती. सत्तांतरानंतर चर्चा अधिक जोर धरु लागल्याने पाटील हे भाजपात सहभागी होणारच असेच वातावरण निर्माण झाले होते. असे असतानाच बबनदादा शिंदे आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने आता भाजपात प्रवेश करुन या चर्चांना ते पूर्णविराम देणार का हे पहावे लागणार आहे. मात्र, कोणत्या मुद्द्यावर नेमकी चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही.

स्थानिक पातळीवर महत्व

बबन शिंदे यांचे माढा मतदार संघात तर राजन पाटील यांचे मोहोळ मतदार संघात राजकीय वजन आहे. शिवाय हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे असून गेल्या काही दिवसांमध्ये यांच्यात नाराजी आहेत. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. आता थेट दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांचीच त्यांनी भेट घेतल्याने बंद दरवाज्यात काय चर्चा झाली ते पहावे लागणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.