AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, सरकारमध्ये आहात सूचना काय देता, अंमलबजावणी करा”

महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेवरुन रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बेसुमार हाल होत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, सरकारमध्ये आहात सूचना काय देता, अंमलबजावणी करा
| Updated on: Nov 02, 2019 | 6:14 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेवरुन रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बेसुमार हाल होत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना फडणवीस सरकार 10 हजार कोटींची मदत देत आहे. ही अगदी तुटपुंजी मदत आहे, असं मत अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “राज्यभरात अवकाळी पावसाने नुकसान केलं आहे. त्यामुळे ही मदत कशालाही पुरणार नाही. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. ते सरकारमध्ये आहेत सूचना काय देत आहेत. त्यांनी थेट अंमलबजावणी करावी. नवीन सरकार येऊपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे. असं बोलून त्यांनी कातडी बचाव भूमिका घेऊ नये.”

जनतेचा कौल भाजप-शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशीही मागणी अजित पवारांनी केली. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आपआपल्या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करत असल्याचीही माहिती दिली. ते म्हणाले, “शरद पवार यांनी नाशिकमधील अनेक तालुक्यांचा दौरा केला आहे. आमचे इतर नेतेही आपआपल्या भागातील दौरा करत आहेत.”

“आत्तापर्यंत अनेकदा शेतीचं नुकसान पाहिलं, मात्र इतकं कधीच झालेलं नाही”

अजित पवार यांनी यावेळी अवकाळी पावसाने झालेलं संपूर्ण राज्यभरातील नुकसान प्रचंड असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मी सातव्यांदा आमदार झालो. आत्तापर्यंत अनेकदा शेतीचं नुकसान पाहिलं. मात्र, यावेळी जितकं नुकसान झालं, तितकं कधीच झालं नव्हतं. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. जनावारांना चाराही राहिला नाही. एकही असं पीक नाही ज्याचं या अवकाळी पावसाने नुकसान झालं नाही. रोगराई पसरत आहे. याची जाण आत्ताच्या राज्यकर्त्यांना नाही. ती त्यांना असायला हवी. आत्तापर्यंत तात्पुरती स्थिती समोर आली असून अजून मोठं नुकसान समोर येणं बाकी आहे.”

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...