चंद्रकांत पाटील मंत्री असताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावरही आरोप केलेले: अजित पवार

| Updated on: Jul 01, 2021 | 5:54 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक मधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवार यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

चंद्रकांत पाटील मंत्री असताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावरही आरोप केलेले: अजित पवार
Ajit Pawar
Follow us on

नाशिक: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक मधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवार यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपसंदर्भात विचारलं असता ज्या आरोपीने पोलीस खात्यात असताना वातावरण खराब केलं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? सवाल त्यांनी उपस्थित केला.चंद्रकांत दादांकडे ज्यावेळेस महसूल मंत्री होते, तेव्हा तिथले आमदार राजेश क्षीरसागर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.दादांबद्दल त्यांनी खूप काही सांगितलं होतं. उद्या एखादा आरोपी आणखी कोणाचे नाव घेईल मग कसं चालेल? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. चंद्रकांत पाटील यांना काहीही सुचत नाही कुठल्या पक्षाच्या अधिवेशनात असे ठराव (अजित पवारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव) झाले असे बघितलं नाही. आरोपीनं दिलेल्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवायचं, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar gave answer to Chandrakant Patil demand of CBI enquiry)

50 टक्के पेरण्या

अजित पवार यांनी पुढे बोलताना कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं सांगितलं. राज्यातील शेती क्षेत्राविषयी बोलताना गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. चांगला पाऊस आल्यावरच पेरण्या करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला दिला. राज्यात खतांची कमतरता नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. कोरोना काळात जीडीपी राखण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं का? अजित पवार म्हणतात

मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं का असं विचारलं असता अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं, असं वाटत नाही, असे स्पष्ट केले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते सांगतात तोपर्यंत सगळं व्यवस्थित असेल. अजित पवार म्हणाले की महाविकास आघाडी सरकारला आत्तापर्यंत दीड वर्ष पूर्ण झालं आहे. माध्यमांमधून अस्वस्थता निर्माण करणाऱ्या बातम्या येतात पण त्यामध्ये तथ्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलं.

आज नाशिकमध्ये कोरोना आढावा बैठक घेतली. सरकारने कोरोना च्या पार्शवभूमीवर उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, अस संकट यापूर्वी कधीही नव्हतं, असं अजित पवार म्हणाले. 2 महिन्यात 70 टक्के लसीकरण करण्याचं ठाकरे सरकारच टार्गेट आहे. मात्र, एवढी लस उपलब्ध नाही. कोरोना कामात निधीची कमतरता भासू नये असा आमचा प्रयत्न आहे. पहिल्या लाटेत 60 च्या वरील लोक मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते. तर,दुसऱ्या लाटेत 30 ते 60 वयोगटातील लोक बाधित झाले. तिसरी लाट आली तर 30 च्या आतील लोकांसाठी धोकादायक, आहे, टास्क फोर्स चं म्हणणं आहे.तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यातच ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले.


अजित पवार आज नाशिकमध्ये एका विवाह सोहळ्याला उपस्थित होते त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. लग्न सोहळ्याला मी गेलो तिथे सगळ्यांचे मास्क होते. माझ्या कार्यक्रमात मध्यंतरी गर्दी झाली, मी कार्यक्रम थांबवले, असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

चुकीला माफी नाही, पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

आधी ठाकरे सरकारने मुंबई पालिका आयुक्तपदावरुन हटवलं, आता परदेशींनी काही तासातच पद नाकारलं

 

(Ajit Pawar gave answer to Chandrakant Patil allegations demand of CBI enquiry)