AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तो पर्यंतच शिंदे फडणवीस सरकार टिकणार; अजित पवारांनी नुसता दावाच केला नाही तर आकडेमोडही मांडली

अजित पवारांच्या बोलण्याचा सूर हाच आहे की, शिंदे-भाजप सरकार कोसळणार. गेल्या महिन्याभरापासून अजितदादा तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत.

... तो पर्यंतच शिंदे फडणवीस सरकार टिकणार; अजित पवारांनी नुसता दावाच केला नाही तर आकडेमोडही मांडली
| Updated on: Oct 15, 2022 | 11:34 PM
Share

मुंबई : 145 चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत सरकार टिकणार. मंत्रिपदावरुन शिंदे गटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळं काही काळ थांबा, सर्वच समोर येईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणालेत. योग्य वेळेची वाट पाहतोय, असं अजित पवारांचं म्हणण आहे. तर, अजित पवारांमध्येच अस्वस्थता असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, शिवसैनिकांना आवडलेलं नाही, असंही अजित पवार वारंवार सांगतायत.

अजित पवारांच्या बोलण्याचा सूर हाच आहे की, शिंदे-भाजप सरकार कोसळणार. गेल्या महिन्याभरापासून अजितदादा तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण सध्या तरी 145 प्लसचं संख्याबळ शिंदे भाजपकडे आहे.

विधानसभेच्या 288 जागा असून बहुमताचा आकडा 145 इतका आहे. शिंदें गटाकडे 40 आणि अपक्ष तसंच इतर 10 आमदारांसह 50चं संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत: 106 आमदार आणि इतर 8 असे एकूण 114 आमदार होताच. म्हणजेच शिंदे-भाजप सरकारचं संख्याबळ होते, 164 आमदाराचं.

MIMकडे 2 आमदार असून, MIMचं नं कोणालाही पाठींबा दिलेला नाही. आणि त्यामुळं महाविकास आघाडीकडे एकूण 122 आमदार आहेत पण मंत्रिपद न मिळाल्यानं, शिंदे गटातील आमदार नाराज होऊन, सरकार पडेल असं अजित पवारांना वाटतंय. महिन्याभरापासून अजित पवारांचा तोच सूर आहे.

इकडे अजित पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही, आमदारांना दिलेल्या आश्वासनामुळंच, मंत्रिमंडळ विस्तारातही अडचण झाल्याचं म्हटलंय.

राजकारणात संख्याबळाला महत्वं असते. साडे 3 महिन्यांआधी महाविकास आघाडीकडे बहुमत होतं..पण बंडामुळं समीकरण बदललं आणि संख्याबळ शिंदे गट आणि भाजपच्या बाजूनं झुकलं. आता पुन्हा काही तरी होईल, असं अजित पवारांना वाटतंय.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.