AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनसेकडेही खोके पोहोचले का?, भोंगा, टोल आंदोलनाचा संदर्भ देत ठाकरे गटाची टीका

ठाकरेगटाच्या वतीने मनसेवर टीका करण्यात आली आहे.

'मनसेकडेही खोके पोहोचले का?, भोंगा, टोल आंदोलनाचा संदर्भ देत ठाकरे गटाची टीका
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 1:39 PM
Share

औरंगाबाद : ‘स्वातंत्र्याची 75 वर्षे… एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याता महाराष्ट्राचा महासंकल्प’, अशी जाहिरात आजच्या सामनाच्या पहिल्या पानावर छापून आली आहे. त्यावरून मनसेने (Raj Thackeray) उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. खोके सामनाच्या ऑफिसपर्यंत पोहोचले का? असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टीका केलीय. त्याला आता ठाकरेगटाच्या वतीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मनसेच्या आंदोलनांचा दाखला देत त्यांना प्रश्न विचारण्यात आलाय.

मनसेनं टोलविरोधात आंदोलन केलं. राज ठाकरे भोंग्यांवर बोलले. पण आता ते अगदी शांत आहेत. याचा ‘राज’ काय? मनसेकडेही खोके पोहोचले का? असं म्हणत ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसेवर टीका केलीय.

सामनातील जाहीराती हा वेगळा मुद्दा आहे. कारण सामना हे महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाहीराती येणं स्वाभाविक आहे. आलेली जाहीरात त्यांनी छापली यात गैर काय? असं अंबादास दानवे म्हणालेत.

मनसेलाच खोक्यांची सवय आहे, असं दानवे म्हणालेत.

आदित्य ठाकरे यांचा दौरा कुठल्याही गर्दीसाठी नाही तर लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आहे. अतिवृष्टीची मदत लोकांना पोहोचली आहे का? याचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे दौरा करत आहेत, अशी माहितीही दानवे यांनी दिलीय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.