मुंबई : दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याणं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया देताना शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार झाल्यास काही लोक सोडून जातील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.