AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत अमित ठाकरेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? वाचा…

वरळी पोलिस कँम्पमधील मुंबईचा पोलिसांच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला अमित ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी अमित ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत अमित ठाकरेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? वाचा...
Amit Thackeray
| Edited By: | Updated on: Jul 27, 2025 | 10:02 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सायंकाळी वरळी पोलिस कँम्पमधील मुंबईचा पोलिसांच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला अमित ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी अदित्य ठाकरे न आल्यामुळे दोघांची भेट टळली. उद्धव ठाकरेच्या वाढदिवासानिमित्त अदित्य ठाकरे येवू शकले नसतील असं अमित ठाकरेंनी सांगितलं. यावेळी अमित ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी, ‘गणोशोत्सव आनंदाचा क्षण असल्याचं पाहिला मिळतो. काल वरळीतील पोलिस बांधव आमंत्रण देवून केले. गेल्या वर्षी ही मी आलो होतो. आज आमचा मेळावा होता. तो रद्द झाला मात्र तो संपल्या वर मी येईल असं सांगितलं होतं’ असं विधान केलं आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे वाढदिवासाला शुभेच्छा दिल्या. मला कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहे याचा आनंद आहे. आजची भेट ही भेट वाढदिवसापुरती होती. महानगरपालिकासाठी युतीचा निर्णय ते दोन भाऊ घेतील. आम्ही ज्युनिअर ते निर्णय घेणार नाहीत. राज ठाकरे बोलतील ते होईल.’

या कार्यक्रमावेळी बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे म्हणाले की, ‘आज पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मुलांनी एकत्र येऊन केलेला हा कार्यक्रम आहे. अजून पुढच्या महिन्याभर वेगवेगळ्या कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. ठाकरे हा ब्रँड आहे या शहराला ठाकरेंची गरज आहे. हे शहर ठाकरे यांना विचारत आणि त्यामुळे ते आले याचा आम्हाला आनंद आहे

उद्धव ठाकरे बोलले की माझ्यासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. शेवटी रक्ताचे नातं आहे लक्षात ठेवा. राजकारणापलीकडे जाऊन ज्यांनी नाते जपले, त्याच्यापैकी उद्धव साहेब एक आहेत. हे नातं जेवढे घट्ट होईल तेवढे महाराष्ट्राला जास्त आनंद होईल उद्धव ठाकरे यांच्या शब्दातून हे स्पष्ट झाले. बाळा नांदगावकर जे बोलले ती वास्तुस्थिती आहे , ठाकरे ब्रॅंड आहे, वन प्लस वन हे 11 जसे होतात तसेच 11 प्लस 11 हे भविष्यात 22 देखील होतील, ठाकरे या नावात ताकद आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा आहे की युती व्हावी आणि ती इच्छा दोन्ही ठाकरे बंधू पूर्ण करतील असं वाटतंय.’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.