AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, पण आता…; मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबावर बच्चू कडू यांची नाराजी

Bacchu Kadu News : अजित पवार यांना युतीत घेताना प्रहारला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं; बच्चू कडू यांनी खंत बोलून दाखवली...

प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, पण आता...; मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबावर बच्चू कडू यांची नाराजी
| Updated on: Jul 06, 2023 | 3:34 PM
Share

अमरावती : अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

मी मंत्रिपदासाठी थोडी बोलत आहे. एकंदरीत या व्यवस्थेमध्ये कोण कसं अडचणीत येत आहे. ते मी सांगत आहे. शेवटी काही मर्यादा असतात. किती वेळ थांबायचं, किती वेळ सहन करायचं याच्याही काही मर्यादा आहेत. जर मर्यादा तुटल्या तर कोणीच कुणाच नसतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मी जे काही करेल ते मीडियाला सांगून करणार नाही. आतमधून सर्व शिजू द्यावं लागतं.व्यवस्थित पाहू आणि मग योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. मग तुम्हाला माहित पडेल की मी काय करू शकतो, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीवर टीका करत अनेक आमदार शिवसेनेमधून बाहेर पडले होते. आता विचारात न घेता राष्ट्रवादीला सत्तेत घेतलं याचा परिणाम शिंदे गटातील 40 आमदारांवर होणार आहे. त्या चाळीस लोकांनी मतदारांना आता काय उत्तर द्यायचं?, असं म्हणत बच्चू कडू यांनी शिवसेमा आमदार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी अडचण बोलून दाखवली.

पहिल्याला मारायचा आणि दुसऱ्याला हाती घ्यायचं. दुसऱ्याला मारायचा तिसऱ्याला हाती घ्यायचं. ही जी काही भूमिका आहे हे थांबलं पाहिजे, असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपसोबत जाऊन चुकी झाल्याचं म्हणून काय फायदा आहे. एकदा चुकलेल्या माणसाला दुरुस्त करता येतं चूक वाटून घेण्यात काही अर्थ नसतो. आता दुरुस्त करावं लागेल जेव्हा वेळ येईल तेव्हा दुरुस्त करू, असं बच्चू कडू म्हणालेत.

काहींना वाटत असेल की आपला पक्ष मोठा होईल पण ते गोत्यात जाणार आहेत, असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपला टोला लगावला आहे.

आपला पक्ष वाढत असताना दुसऱ्याचे मरण होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. एवढा मोठा निर्णय घेत असताना आमचा प्रहार पक्ष आहे. आम्हाला सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे होतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.