AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार?; नाना पटोले यांच्या ‘या’ विधानाने लक्ष वेधलं

Nana Patole on Baramati Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सर्वच पक्षांची जोरदार तयारी पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका काय?; बारामती मतदारसंघाबाबत नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...

Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार?; नाना पटोले यांच्या 'या' विधानाने लक्ष वेधलं
| Updated on: Oct 11, 2023 | 11:14 AM
Share

स्वप्नील उमप, प्रतिनिधी- टीव्ही 9, अमरावती | 11 ऑक्टोबर 2023 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी एक असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतची महत्वाची बातमी आहे. हा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आता या मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार का? असा प्रश्न चर्चेत आहे. याला कारण ठरलंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं एक वक्तव्य. बारामतीमध्ये आमचे कार्यकर्ते दावा करत आहेत. तानाशाही व्यवस्थाला उलथून टाकायची आहे. मेरिडच्या आधारावर जागा वाटप होणार आहे. सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचा दावा खोडलेला नाही. बारामतीमध्ये देखील आमचे कार्यकर्ते दावा करत आहेत, असं नाना पटोले म्हणालेत. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे बारामती मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. नाना पटोले यांच्या स्वागताचे बॅनर अमरावती शहरात लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील 4 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघाचा नाना पटोले आढावा घेत आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी नाना पटोले चर्चा करणार आहेत. अमरावती विभागातील आजी माजी खासदार आमदार बैठकीला उपस्थिती लावणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आढावा घेत आहेत.

राज्यभरात आम्ही आढावा घेत आहोत. आज अमरावती विभागाचा आढावा घेत आहोत. हा संघटात्मक आढावा आहे. सध्या लोकांसमोर काँग्रेस हाच एक चांगला पर्याय आहे. अमरावती हा वैचारिक लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारा हा जिल्हा आहे. खालच्या पातळीवर जाऊन चारित्र्यवर बोलणं सुरू आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी अमरावती जिल्ह्याचा तमाशा थांबवावा, हीच आग्रहाची विनंती आहे, असं नाना पटोले म्हणाले.

हिंमत असेल तर सरकारने जातिनिहाय जनगणना करावी. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्स व्यवसाय होऊ शकत नाही. योग्य वेळी आम्ही पुरावे देऊ. राज्यकर्ते आणि पोलिसांमुळे तरूण तरुण देवभूमी नाशिकमध्ये ड्रग्स घेत आहे.अनेक तरुण तरुण आत्महत्या करत आहेत. यंदा पाऊस चांगला नाही पडला. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. हे सरकार दुष्काळ जाहीर करणार नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.