AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीपूर्वीच भाजपने खातं उघडलं, तिसऱ्या जागेवरही बिनविरोध निवड

इटानगर : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या फक्त दोन जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशातही विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपचे तीन उमेदवार विजय झाले आहेत. दोन विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यातील दिरांग मतदारसंघातून भाजपचा तिसराही उमेदवार विजयी झाल्याचं भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव […]

निवडणुकीपूर्वीच भाजपने खातं उघडलं, तिसऱ्या जागेवरही बिनविरोध निवड
BJP
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

इटानगर : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या फक्त दोन जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशातही विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपचे तीन उमेदवार विजय झाले आहेत. दोन विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यातील दिरांग मतदारसंघातून भाजपचा तिसराही उमेदवार विजयी झाल्याचं भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव यांनी म्हटलंय.

यापूर्वी दुसरी जागा जिंकल्याची माहिती राम माधव यांनी मंगळवारी दिली होती. सर केंटो जिनी आलो पूर्व विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले होते. शिवाय इंजिनीअर ताबा तेदिव हे देखील येचुली विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्याने भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलंय.

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही होत आहे. इथे लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या 60 जागा आहेत. सध्या भाजपचीच सत्ता असलेल्या अरुणाचल प्रदेशात 11 एप्रिल रोजी विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान होईल. पेमा खांडू सध्या अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलो पूर्व विधानसभेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता. छाननीनंतर काँग्रेसचे उमेदवार मिनकिर लोलेन यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. त्यामुळे केंटो जिनी यांचाच एकमेव वैध अर्ज आहे. 28 मार्चच्या नंतरच या उमेदवारांनी विजयी घोषित केलं जाईल, कारण 28 मार्च उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

भाजप अरुणाचल प्रदेशातील सर्वच्या सर्व 60 जागांवर निवडणूक लढत आहे. पण निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला होता. कारण, भाजपच्या तब्बल 20 नेत्यांनी एनपीपी या पक्षात प्रवेश केला होता, ज्यात दोन मंत्री आणि सहा आमदारांचाही समावेश आहे. काँग्रेसनेही इथे जोर लावला आहे. अरुणाचलमधील प्रादेशिक पक्ष एनपीपी 33 जागांवर, जेडीएस 18 आणि जेडीयू 13 जागांवर निवडणूक लढवत आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.