AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया… धनंजय मुंडे यांचा शायरीतून निशाणा

मंत्री झाल्याने जबाबदारी आहे वाढली आहे. जनतेची कामे करायची आहेत. जिथे जाल तिथे सांगा मी प्रभू परळी वैद्यनाथाच्या नगरीतला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादीतील फूट आणि मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच परळीत आले होते.

समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया... धनंजय मुंडे यांचा शायरीतून निशाणा
dhananjay mundeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 14, 2023 | 7:32 AM
Share

बीड : मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे काल परळीत आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुंडे यांच्या स्वागतासाठी सात क्विंटलचा फुलांचा हार मागवण्यात आला होता. मुंडे यांच्या स्वागतासाठी हजारो लोक परळीत हजर होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी परळीकरांशी संवाद साधला. शेरोशायरीतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया, मेरी काबिलीयत पर लोग शक करने लगे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.

मागीलवेळी मंत्री झालो तेव्हा मिरवणुकीत एवढा वेळ गेला की भाषण करता आले नाही. माझ्या जीवनात कधीच असा प्रतिसाद मिळाला नाही इतका मोठा प्रतिसाद आज मिळतो आहे. माझ्या संकटकाळात जे लोक सोबत आणि पाठीशी होते त्या सर्वासमोर नतमस्तक होतो.मी दुसऱ्यांदा मंत्री झाल्यावर काय बोलावे? कुणाकुणाचे आभार मानावे, ऋण व्यक्त करावे हेच कळत नाही. मी इथल्या प्रत्येक व्यक्तीला एक शब्द दिला होता. तो पूर्ण केल्याचा मला अभिमान वाटतो. तो म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही करायची वेळ येील तेव्हा परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही, असं मी म्हणालो होतो. तो शब्द पूर्ण केला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

आज पुन्हा तुमच्या डोळ्यात प्रेम दिसतंय

सकाळी 9 वाजता नगरहून निघालो आणि रात्री पावणे दहा वाजता परळीत पोहोचलो. सहा महिन्यापूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोर येतोय. अपघात झाल्यावर आपण जे प्रेम दाखवले, त्यानंतर आज परत तुमच्या डोळ्यात प्रेम दिसतंय, असं भावूक उद्गारही त्यांनी काढलं.

सत्ता येते आणि जाते

महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं, काय नाही झालं हे आपण पाहिलं असेल. याचे तुम्हाला काही सोयरसुतक वाटतेय का? नाही. आगामी काळात आपल्याला राज्यात आणि देशात अधिक सन्मान मिळेल. सत्ता येते आणि जाते. पण सत्ता येताना आणि जाताना काय फरक असतो ते मी पाहिले आहे, असं ते म्हणाले.

मंत्रिमंडळ परळीत आणणार

पूर्वी ज्या पक्षात होतो तेव्हा मला विधान परिषदेत जायला मिळाले. मी पहिल्यांदा विधान मंडळात गेलो ते केवळ अजितदादांमुळे. मंत्री झालोय, त्यामुळं तुमच्या अपेक्षा वाढल्यात. कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे फार अवघड नाही. ही तयारी पाहिल्यावर नियम पाळावा की तोडावा असे वाटते. पण समोर चॅनेलवाले आहेत. परत एकदा सभा घ्यायची आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाला परत इथे आणायचे आहे. अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना परळीत आणणार. आपल्या मातीचे नाव उभ्या देशात गाजवल्या गप्प बसणार नाही, असंही ते म्हणाले.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.