AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सभागृहात येऊन माफी मागा”, भडकलेल्या विधानसभा अध्यक्षांची मुख्य सचिवांना शिक्षा

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य सचिवांना विधीमंडळ सभागृहात येऊन जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.

सभागृहात येऊन माफी मागा, भडकलेल्या विधानसभा अध्यक्षांची मुख्य सचिवांना शिक्षा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 02, 2020 | 12:55 PM
Share

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य सचिवांना विधीमंडळ सभागृहात येऊन जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले आहेत (Action against Chief Secretory). राज्यभरातील आमदार विधीमंडळात आपले औचित्याचे मुद्दे उपस्थित करतात मात्र, त्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना वेळेत उत्तरंच मिळत नाहीत. यावर नाना पटोले आज (2 मार्च) चांगलेच भडकले. यावेळी त्यांनी मुख्य सचिवांनाच थेट माफी मागण्याचे आदेश दिले.

नाना पटोले म्हणाले, “मागच्या अधिवेशनात 83 औचित्याचे मुद्दे होते. त्यापैकी फक्त 4 उत्तर पाठवली आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या कामकाजाबाबत सचिवालयात अधिकारी दखल घेत नाहीत. मी जोपर्यंत खुर्चीत आहे तोपर्यंत माझ्या सभागृहाचा अपमान केला तर मी कारवाई करणारच.”

“तहसीलदार पण आमदारांचं ऐकत नाही, आदर करत नाही, आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. या वागणुकीला मुख्य सचिवांनाच जबाबदार धरलं जाईल. मुख्य सचिवांनी प्रशासन कसं काम करतं याकडे बघितलं पाहिजे.”

विधी मंडळातील कामकाजबाबत अध्यक्ष नाना पटोले यांनी आज गंभीर पाऊल उचलत कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट माफीचे आदेश दिले. यानंतर अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांना इतकी शिक्षा नको अशी भूमिका घेतली. ते म्हणाले, “यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही. मुख्य सचिवांना एवढी मोठी शिक्षा नको. मी शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो.”

यावर मुख्य सचिवांनी माफ करा, आम्ही सुधारणार करु, असं आश्वासन दिलं. ते म्हणाले, “आपल्या भावना समजून घेता, माफ करा, आम्ही सुधारणा करू. पुन्हा अशी वेळ येणार नाही, यापुढे याबाबत खबरदारी घेऊ. आजपर्यंत विधिमंडळाच्या कामकाज इतिहासात अध्यक्षांनी मुख्य सचिवांना शिक्षा दिलेली नाही.”

विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर अजित पवार यांच्याशी सहमती दाखवली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ते बरोबर आहे. ही शिक्षा कठोर आहे. अधिकाऱ्यांना दालनात बोलावून समज द्या.” महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “मागील उत्तरं आली नाही. त्यामुळे आपला रोष समजू शकतो. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी जी विनंती केली ती आपण मान्य करावी, अशी विनंती.”

अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपली कारवाई मागे घेतली. नाना पटोले म्हणाले, “उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, विरोधी पक्षनेते यांनी निवेदनं केली आहेत. सभागृहाचे पावित्र्य ठेवलं जात नसेल, तर कडक धोरण घेणं आवश्यक आहे. आता तुम्ही सगळ्यांनी आश्वासन दिलं आहे. म्हणून मी कारवाई मागे घेतो.”

Action against Chief Secretory

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल