AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : ‘भारत जोडो’ यात्रेमुळे भाजपाला भरली धडकी, जनतेचे लक्ष हटवण्यासाठी टी शर्टवरुन आरोप, काय म्हणाले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष?

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली आहे. 150 दिवसांमध्ये 3 हजार 500 किमीचा प्रवास व 12 राज्यातून ही यात्रा जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुल गांधी हे थेट केंद्र सरकारला जाब विचारत आहेत.

Congress : 'भारत जोडो' यात्रेमुळे भाजपाला भरली धडकी, जनतेचे लक्ष हटवण्यासाठी टी शर्टवरुन आरोप, काय म्हणाले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष?
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खा. राहुल गांधी
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 10, 2022 | 4:00 PM
Share

मुंबई :  (Congress) कॉंग्रेसच्या (Bharat Jodo) भारत जोडो यात्रेपेक्षा चर्चा रंगली होती ती यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टची. राहुल गांधी यांनी तब्बल 41 हजार 257 रुपयांचा टी शर्ट घातल्याचे समोर आले होते. त्यामुळे भारत जोडो यात्रा राहिली लांब आणि वेगळ्याच विषयाची चर्चा सुरु झाली होती. पण या सर्व बाबींना (Nana Patole) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. 10 लाखांचा सुट, 1 लाख 5 हजाराचा चष्मा व 8 हजार कोटींचे विमान वापरणाऱ्या फकिर मोदींवरही बोला, असा सवाल सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. तर या यात्रेने भाजपाला धडकी भरली असून यावर जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून हा केलेला प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले आहेत.

150 दिवसांमध्ये 3 हजार 500 किमीचा प्रवास

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली आहे. 150 दिवसांमध्ये 3 हजार 500 किमीचा प्रवास व 12 राज्यातून ही यात्रा जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुल गांधी हे थेट केंद्र सरकारला जाब विचारत आहेत. जनतेचे हे प्रश्नच महत्वाचे आहेत हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येत असल्याचे पटोले म्हणाले आहेत.

जनतेच्या प्रतिसादामुळे भाजपाला धडकी

भारत जोडो यात्रे दरम्यान, राहुल गांधी हे सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यामुळे जनता कोणत्या समस्येने त्रस्त आहे हे देखील निदर्शनास येत आहे. शिवाय जनतेशी थेट संवाद होत असल्याने यात्रेमध्ये सहभागी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. वाढत्या प्रतिसादामुळेच भाजपाला धडकी भरली असून टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे काढावे लागत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढला जाणार

भारत जोडो ही एक यात्राच नाहीतर जनसामान्यांच्या भावना समजून घेण्यासाठीचा केलेला प्रयत्न आहे. शिवाय जनतेमध्ये गेल्याशिवाय त्यांचे प्रश्न हे समजणार नाहीत. त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीर असे यात्रेचे स्वरुप राहणार आहे. त्यामुळे भाजपाने कोणताही मुद्दा घेऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरी आता राहुल गांधीच थेट जनतेच्या भेटीला जात असल्याने त्यांचा प्रयत्न साध्य होणार नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष