AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल बंद करुन भावना गवळींची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

यवतमाळ : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेमधून फक्त दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनाच संधी देण्यात आली आहे. पण मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी शपथविधीला उपस्थित नसतील. शिवाय त्यांचा फोनही बंद आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भावना गवळी नाराज झाल्याची माहिती आहे. शिवसेनेतून कुणाला मंत्रिपद दिलं […]

मोबाईल बंद करुन भावना गवळींची शपथविधी सोहळ्याकडे पाठ
Bhavana Gawali
| Edited By: | Updated on: May 30, 2019 | 5:11 PM
Share

यवतमाळ : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेमधून फक्त दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनाच संधी देण्यात आली आहे. पण मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी शपथविधीला उपस्थित नसतील. शिवाय त्यांचा फोनही बंद आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भावना गवळी नाराज झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेतून कुणाला मंत्रिपद दिलं जातं याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पण यामुळे ग्रामीण भागातील खासदार नाराज असल्याचं कळतंय. भावना गवळी या सलग पाचव्यांदा निवडून आल्या आहेत. तरीही त्यांना डावलण्यात आल्याने त्यांची निराशा झाली असण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

भावना गवळी सलद पाचव्यांदा लोकसभेवर

भावना गवळी यांनी काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा तब्बल सव्वा लाख   मतांनी पराभव करून शिवसेनेचा हा गड कायम राखला. तर्कवितर्क आणि अफवांना पूर्णविराम देत, निकाल पूर्णपणे आपल्याकडे झुकवून भावना गवळी यांनी या मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयाची नोंद केली. संपूर्ण देशात दिसणाऱ्या ‘नमो’ लाटेने विदर्भात काँग्रेस आघाडीचा जो सुपडासाफ केला त्याला यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघही अपवाद ठरला नाही.

एकीकडे दिग्गज आणि मुरब्बी राजकारण्यांची फळी, तर दुसरीकडे विश्वासू तरुणाईची नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा या बळावर भावना यांनी संपूर्ण प्रचार राबविला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ग्रामीण स्तरावर पोहोचलेले जाळे आणि त्यांच्या नेत्यांची करडी नजर यातून माणिकराव ठाकरे यांचा विजय होणार असा दावा करण्यात येत होता. पण मतदारराजाच्या मनात ‘नमो’ लाट आणि दांडगा जनसंपर्क असणाऱ्या नेतृत्वाबद्दलची ममतेची ‘भावना’ यातूनच अशक्यप्राय वाटणारा हा विजय भावना गवळी यांनी खेचून आणला.

खासदार भावना गवळी यांच्या विजयासाठी वाशिम – यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जीवाचं राण केलं होतं. योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही असे म्हटले जाते. विविध घटना तसेच अनुभवावरून हे वेळोवेळी सिद्ध झालेले आपण पाहतो. सलग पाचव्यांदा  खासदार म्हणून विराजमान झालेल्या भावना गवळी या सुद्धा राजयोग घेऊनच जन्माला आल्याचं दिसून येत आहे. त्यांचे वडील माजी खासदार स्व. पुंडलीकराव गवळी यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेऊन वयाच्या 24 व्या वर्षी 19999 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या, यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाच लोकसभा निवडणुकात विजय मिळविला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.