AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: बिहारमधील नितीश-तेजस्वी सरकार पडणार?, मोठ्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

जेडीयू-आरजेडी युती तुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्याची कारणं काय आहेत पाहुयात...

मोठी बातमी: बिहारमधील नितीश-तेजस्वी सरकार पडणार?, मोठ्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 04, 2023 | 11:02 AM
Share

पटना : बिहारच्या (Bihar) राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जेडीयूने भाजपसोबत काडीमोड केल्यानंतर 10 ऑगस्टला 2022 ला बिहारमध्ये जेडीयू-आरजेडी आघाडीचं (JDU RJD Alliance) सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता ही युती तुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना अधोरेखित केलं जात आहे.

बिहारचे माजी कृषिमंत्री आणि आरजेडीचे आमदार सुधाकर सिंह मागच्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात विधानं करत आहेत. अशातच आता जेडीयूचे नेतेही सिंह यांच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. उपेंद्र कुशवाह यांनी सुधाकर सिंह यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

सुधाकर सिंह यांचं विधान काय?

आरजेडीचे नेते सुधाकर सिंह हे नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. “नितीश कुमार यांना 350 कोटींच्या विमानातून आरामात फिरायचं आहे. बिहारला विशेष दर्जा मिळावा यासाठी ते हातात कटोरा घेऊन दिल्लीला जात आहेत. असा भिकारी मी कधीही पाहिला नाही. यांनी लाज विकली आहे”, असं सुधाकर सिंह म्हणाले आहेत.

सुधाकर सिंह यांच्या विधानाला उपेंद्र कुशवाह यांनी उत्तर दिलं आहे. सुधाकर सिंह यांची असली बेताल वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत. ज्यांच्या पाठिशी बिहारची जनता आहे. जनतेनं प्रेम देऊन त्यांना मुख्यमंत्री केलंय.अशाविरोधात नेत्यासाठी सुधाकर सिंह यांची असली वक्तव्य कुणालाही आवडणारी नाहीत. सिंह यांच्या वक्तृत्वामुळे युतीचं मोठं नुकसान होऊ शकतं.लक्षात घ्यायला हवं.या वक्तव्याचे परिणाम काय होतील माहिती नाही. पण युती तुटेल या भीतीने यावर मी काहीही न बोलणं उचित नाही. ती तत्वांशी तडजोड असेल. ही तडजोड मला मान्य नाही, असं उपेंद्र कुशवाह म्हणाले आहेत.

सुधाकर सिंह यांच्या या वक्तव्यानंतर आरजेडीकडून त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. हे त्यांचं वैयक्तिक विधान असल्याचं म्हणण्यात आलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून वारंवार केले जाणारे आरोपप्रत्यारोप पाहता ही युती तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युती तुटल्यास सरकार कोसळणार असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

Follow Us
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...
थेट "भावी कॅबिनेट मंत्री..." बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा,
Dhananjay Munde | थेट
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदार थेट दिल्लीत...
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत... अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?