AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve : ‘भाजपला दुसरा पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही’ रावसाहेब दानवे म्हणतात, ‘…तर असंतुष्ट असलेल्यांचं स्वागत’

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय. आगामी काळातील राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुशंगाने दानवेंनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

Raosaheb Danve : 'भाजपला दुसरा पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही' रावसाहेब दानवे म्हणतात, '...तर असंतुष्ट असलेल्यांचं स्वागत'
रावसाहेब दानवेImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Sep 03, 2022 | 10:06 AM
Share

ठाणे : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आता आम्हाला दुसरा कोणताही राजकीय पक्ष (Political Party in Maharashtra) फोडण्यात इंटरेस्ट नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. दुसऱ्याचा पक्ष फोडण्याची भाजपला गरज नाही, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण (Devendra Fadnavis Ashok Chavhan Visit) भेटीनंतर सुरु झालेल्या राजकीय चर्चांवर दानवे यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. यावेळी इतर पक्षातील असंतुष्ट राजकीय नेत्यांवरही त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. दानवेंनी केलेल्या विधानाचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत. गणेशोत्सवासाठी कपिल पाटील यांच्या निवासस्थानी आले असता रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलंय. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

कपिल पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की,..

दुसरा पक्ष फोडण्यात भाजपला इंटरेस्ट नाही. कुणाचा पक्ष भाजप फोडतही नाही. पण कुणाच्या पक्षात जर फूट पडत असेल आणि ते जर आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. आम्हाला जेव्हा गरज पडेल आणि उपयोग होईल, तेव्हा जेवढे केवढे असंतुष्ट गट असतील, त्यांचा भाजपसाठी तेव्हा उपयोग करुन घेऊ. आज आम्हाला कुणाचीही गरज नाहीये. आमच्या विचारांशी असंतुष्ट सहमत असतील, तर त्यांना सोबत घेऊ.

भाजप कुणाकुणाला जवळ करणार?

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय. आगामी काळातील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दानवेंनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

येत्या काळात भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षातील कोणकोणत्या असंतुष्टांना आता आपल्यासोबत घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दानवेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय.

Follow Us
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत
विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर...
Vilas Ghule Case | विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले?
रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला
Raigad Heavy Rain | रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला