AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve : ‘भाजपला दुसरा पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही’ रावसाहेब दानवे म्हणतात, ‘…तर असंतुष्ट असलेल्यांचं स्वागत’

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय. आगामी काळातील राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुशंगाने दानवेंनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

Raosaheb Danve : 'भाजपला दुसरा पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही' रावसाहेब दानवे म्हणतात, '...तर असंतुष्ट असलेल्यांचं स्वागत'
रावसाहेब दानवेImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Sep 03, 2022 | 10:06 AM
Share

ठाणे : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आता आम्हाला दुसरा कोणताही राजकीय पक्ष (Political Party in Maharashtra) फोडण्यात इंटरेस्ट नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. दुसऱ्याचा पक्ष फोडण्याची भाजपला गरज नाही, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण (Devendra Fadnavis Ashok Chavhan Visit) भेटीनंतर सुरु झालेल्या राजकीय चर्चांवर दानवे यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. यावेळी इतर पक्षातील असंतुष्ट राजकीय नेत्यांवरही त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. दानवेंनी केलेल्या विधानाचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत. गणेशोत्सवासाठी कपिल पाटील यांच्या निवासस्थानी आले असता रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलंय. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

कपिल पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की,..

दुसरा पक्ष फोडण्यात भाजपला इंटरेस्ट नाही. कुणाचा पक्ष भाजप फोडतही नाही. पण कुणाच्या पक्षात जर फूट पडत असेल आणि ते जर आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. आम्हाला जेव्हा गरज पडेल आणि उपयोग होईल, तेव्हा जेवढे केवढे असंतुष्ट गट असतील, त्यांचा भाजपसाठी तेव्हा उपयोग करुन घेऊ. आज आम्हाला कुणाचीही गरज नाहीये. आमच्या विचारांशी असंतुष्ट सहमत असतील, तर त्यांना सोबत घेऊ.

भाजप कुणाकुणाला जवळ करणार?

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय. आगामी काळातील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दानवेंनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

येत्या काळात भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षातील कोणकोणत्या असंतुष्टांना आता आपल्यासोबत घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दानवेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?