AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सामना’चं नाव बदलून आता ‘बाबरनामा’ ठेवा, गोपीचंद पडळकरांची शिवसेनेवर जळजळीत टीका

Gopichand Padalkar on Shivsena | गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक सातत्याने वाढत आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातही संवाद वाढताना दिसत आहे.

'सामना'चं नाव बदलून आता 'बाबरनामा' ठेवा, गोपीचंद पडळकरांची शिवसेनेवर जळजळीत टीका
गोपीचंद पडळकर आणि संजय राऊत
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 10:29 AM
Share

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’चं नाव आता ‘बाबरनामा’ ठेवा, अशी झणझणीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शिवसेना खासदार यांच्या ‘सामाना’तील रोखठोक सदरात लिहलेल्या लेखावरुन पडळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब #ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय, असे गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून गोपीचंद पडळकर यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक सातत्याने वाढत आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातही संवाद वाढताना दिसत आहे. नुकतीच दिल्लीत या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीचा तपशील संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून जाहीर केला होता. त्याचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

संजय राऊत आणि राहुल गांधींची भेट

मंगळवारी दुपारी मी दिल्लीत राहुल गांधीं यांना भेटले. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. ‘या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.’ अशी सुरुवात राहुल गांधी यांनी केली. ‘यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!’ हे त्यांचं पुढचे विधान अधिक महत्त्वाचे. प्रियंका गांधी तुरुंगात होत्या व उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. ‘आप चिंता मत करिये,’ असे मी म्हणताच, ‘हम जेल की चिंता नही करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले.

‘पंजाबचा तिढा सुटला काय?” – संजय राऊत ‘नक्कीच. सगळे आमदार काँग्रेससोबतच आहेत. जुन्या व्यवस्थेवरच त्यांची नाराजी होती.” – राहुल गांधी. ‘सिद्धूचे काय करणार?” – संजय राऊत ‘तेसुद्धा शांत होतील.” – राहुल गांधी.

आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करुन देतायत, राहुल गांधींना खंत

आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलंय.

हे ही वाचा :

राहुल गांधींबरोबर अर्धा तास चर्चा, भेटीतला शब्द न शब्द संजय राऊतांनी सांगितला, म्हणाले, ‘राहुलजी तो दिवस लवकर उजाडो’

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.