AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya | नोएडाच्या नियमबाह्य इमारती पाडल्या, मुंबईच्या बिल्डिंगचं काय? किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. ते म्हणाले, बिल्डर्स लॉबीने भ्रष्ट पद्धतीने महापालिकेच्या शासक, अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली आहे. सदनिधाकरकांनी तसेच सोसायटीने चौकशी केल्यानंतर त्यांना अनधिकृत मजल्यांचा एफएसआय, टीडीआर घेतलेला नाही.

Kirit Somaiya | नोएडाच्या नियमबाह्य इमारती पाडल्या, मुंबईच्या बिल्डिंगचं काय? किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
किरीट सोमय्या, भाजप नेते Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 12:55 PM
Share

मुंबईः नोएडा येथील नियमबाह्य ट्विन टॉवर (Noida Twin Tower) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) आदेशानुसार रविवारी जमीनदोस्त करण्यात आले. पण मुंबईतदेखील अनेक इमारती नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यावरही कारवाई हवी. यासाठी आधी इमारतींचं स्पेशल ऑडिट करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. मुंबईत त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. मुंबईत शेकडो इमारती अनधिकृत आहेत. अनेक इमारतींना ओसी मिळालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केलं.

सोमय्यांची मागणी नेमकी काय?

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून मुंबईतील इमारतींचं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. पत्रात ते लिहितात, ‘ काल नोएडातील ट्विन टॉवर्स पाडण्यात आले. मुंबईत शेकडो अनधिकृत टॉवर्स, हजारो अनधिकृत मजले अनेक वर्षांपासून बांधण्यात आले आहेत. त्यातील मध्यमवर्गीय सदनिधारक असुरक्षित, भीतीत आहेत. त्यांचे काय अशी चिंता आहे. नोएडातील प्रकरणावरून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रेरणा घेऊन मुंबईतल्या हजारो सदनिधारकांची काळजी करावी, अशी विनंती…

OC न मिळालेल्यांचे स्पेशल ऑडिट व्हावे

मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. ते म्हणाले, बिल्डर्स लॉबीने भ्रष्ट पद्धतीने महापालिकेच्या शासक, अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली आहे. सदनिधाकरकांनी तसेच सोसायटीने चौकशी केल्यानंतर त्यांना अनधिकृत मजल्यांचा एफएसआय, टीडीआर घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना पार्ट ओसी देण्यात आला आहे. अशा हजारो सदनिका मध्यमवर्गीयांना विकल्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत टॉवर्स, अनधिकृत मजल्यांचे तसेच ज्या इमारतींना अजूनही भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेली नाही, त्यांचे स्पेशल ऑडिट व्हावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

‘अनिल परबचं रिसॉर्टही १२ सेकंदात उध्वस्त करा’

शिवसेना नेते अनिल परब यांचं दापोली येथील रिसॉर्ट अनधिकृत असून सरकारने या रिसॉर्टवरदेखील आधी कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. नोएडा येथील नियमबाह्य ट्विन टॉवर 12 सेकंदात उध्वस्त करण्यात आले, तसं हे रिसॉर्टदेखील  12 सेकंदात पाडा, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.