AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे ?

अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला. Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope

टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप,  महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे ?
अतुल भातखळकर, राजेश टोपे
| Updated on: May 05, 2021 | 12:58 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होतेय. दुसरीकडे लसीकरणाच्या मुद्यावरुन राजकारण देखील तापलेलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे अतुल भातखळकर यांनी यावेळी राजेश टोपे जालन्याचे आरोग्यमंत्री आहेत की महाराष्ट्राचे?,असा प्रश्न उपस्थित केला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope on extra corona vaccine allocation Jalna)

राजेश टोपेंवर निशाणा

केंद्राकडून मिळालेल्या 26.77 लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?, अशा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारवर मनमानीचा आरोप

अतुल भातखळकर यांनी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधताना महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार डोस ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे? आहात असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राला 26.77 लाख लसी

केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 26.77 लाख लसींचं साठा दिला आहे. या लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावरुनही राज्य सरकारवर निशाणा

ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

भाजपला ‘ओबीसीं’चा नारा देण्याची वेळ का आलीय?; वाचा राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

(BJP MLA Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope on extra corona vaccine allocation Jalna)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.