AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election: भाजपलाच राज्यसभेची तिसरी जागा का मिळावी?; चंद्रकांतदादांनी आघाडीच्या नेत्यांना सांगितले तीन लॉजिक

Rajya Sabha Election: आघाडीच्या नेत्यांनी आमचा उमेदवार राज्यसभेत पाठवा. तुम्हाला विधान परिषदेत पाठिंबा देतो, असा प्रस्ताव भाजपला दिला. त्यावर हाच प्रस्ताव उलटा केला तर? असा सवाल भाजपने केला.

Rajya Sabha Election: भाजपलाच राज्यसभेची तिसरी जागा का मिळावी?; चंद्रकांतदादांनी आघाडीच्या नेत्यांना सांगितले तीन लॉजिक
भाजपलाच राज्यसभेची तिसरी जागा का मिळावी?; चंद्रकांतदादांनी आघाडीच्या नेत्यांना सांगितले तीन लॉजिक Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2022 | 2:06 PM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीतून (Rajya Sabha election) अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महाविकास आघाडीच्या (mahavikas agahdi) नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभा बिनविरोध करण्याचं आवाहन भाजप नेत्यांना केलं. राज्यसभेचा तुमचा उमेदवार मागे घ्या. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला विधान परिषदेत मदत करू, असं महाविकास आघाडीने भाजपला सांगितलं. पण भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. उलट तुम्हीच आम्हाला राज्यसभेला मदत करा. आम्ही तुम्हाला विधान परिषदेला मदत करू, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आघाडील तीन लॉजिक दिले आहेत. भाजपसाठी ही जागा किती महत्त्वाची आहे. याबाबतचे हे लॉजिक आहेत. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी उमेदवार मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक होणारच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, शिवसेना नेते अनिल देसाई आणि काँग्रेस नेते सुनील केदार आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या पाच नेत्यांमध्येच राज्यसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. तब्बल तासभर ही चर्चा झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन चर्चेतील तपशील सांगितला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा तपशील सांगतानाच राज्यसभेची जागा भाजपला का हवी आहे याचं लॉजिकही आघाडीच्या नेत्यांना सांगितल्याचं स्पष्ट केलं.

पहिलं लॉजिक काय?

चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभेच्या जागेबाबत आघाडीच्या नेत्यांना तीन लॉजिक सांगितले. त्यापैकी पहिलं लॉजिक म्हणजे मागच्यावेळी राज्यसभेवर आमचे तीन सदस्य निवडून गेले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने ही जागा भाजपचीच आहे. त्यामुळे आम्ही ही जागा लढवत असून आघाडीने आम्हाला पाठिंबा द्यावा. हव तर विधान परिषदेत आम्ही पाचवा उमेदवार देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांना सांगितलं.

दुसरं लॉजिक काय?

चंद्रकांतदादांनी दुसरं लॉजिक देताना थेट आकड्यांवरच बोट ठेवलं. आमच्याकडे 24 मते आहेत. आमच्या सहयोगींचे सहा मते आहेत. म्हणजे आमच्याकडे एकूण 30 मते आहेत. आम्हाला फक्त 11 ते 12 मते कमी पडत आहेत. आघाडीच्या मतांचा आकडा 30च्या पुढे जात नाही. आमच्या मागच्यावेळी तीन जागा होत्या त्या मिळाव्या हे लॉजिक आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

तिसरं पण महत्त्वाचं लॉजिक

चंद्रकांत पाटील यांनी तिसरं लॉजिक दिलं. तेही महत्त्वाचं आहे. आघाडीच्या नेत्यांनी आमचा उमेदवार राज्यसभेत पाठवा. तुम्हाला विधान परिषदेत पाठिंबा देतो, असा प्रस्ताव भाजपला दिला. त्यावर हाच प्रस्ताव उलटा केला तर? असा सवाल भाजपने केला. तुम्ही आम्हाला राज्यसभा सोडा, आम्ही तुम्हाला विधान परिषद सोडतो, असं भाजपने स्पष्ट केलं. त्यावर तुमचे राज्यसभेत भरपूर खासदार आहेत. आमचा एखादा पाठवू द्या. तेवढाच एक आकडा वाढेल, असं आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं, असं पाटील म्हणाले. त्यावर आम्हीही आमची भूमिका मांडली. त्यांना जशी त्यांच्या आघाडीची काळजी आहे. तशी आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. आमच्या उमेदवाराला पार्टीचा एबी फॉर्म दिला आहे. तिसरा उमेदवार मागे घेणं आमच्या लेव्हलाल शक्यच नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला राज्यसभा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे आमचा क्लेम लॉजिकच्या आधारे आहे, असं आघाडीच्या नेत्यांना सांगितल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद