AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 कोटींवरुन मातोश्रीवर निशाणा साधणाऱ्या प्रतापराव जाधवांना थेट केंद्रात जबाबदारी! चर्चा तर होणारच…

मातोश्रीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे प्रतापराव जाधव चर्चेत आले होते. त्यानंतर आता त्यांच्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

100 कोटींवरुन मातोश्रीवर निशाणा साधणाऱ्या प्रतापराव जाधवांना थेट केंद्रात जबाबदारी! चर्चा तर होणारच...
प्रतापराव जाधवImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 06, 2022 | 8:46 AM
Share

गणेश सोलंकी, TV9 मराठी, बुलढाणा : बुलढाण्याच्या खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची केंद्र सरकारने (Central Government) दखल घेतलीय. त्यांच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आलीय. माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. मोदी सरकारकडून (Modi Government) शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या घडामोडीची राजकीय चर्चा झाली नाही, तरच नवल!

संसदेच्या स्थायी समितीत काही महत्त्वाचे बदल केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिंदे गटालाही महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या रुपाने शिंदे गटाला माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधवांकडे जबाबदारी सोपवण्यात आलीय.

पाहा व्हिडीओ :

सनसनाटी आरोपांमुळे चर्चेत

उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतापराव जाधव यांनी नुकताच सनसनाटी आरोप केला होता. सचिन वाझे 100 कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता, अशा आशयाचं प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. या आरोपावरुन एकच खळबळ उडाली होती. अखेर प्रतापराव जाधव यांनी आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं, असंही नंतर स्पष्ट केलं होतं.

100 खोके मातोश्री ओके, असं वक्तव्य केल्यामुळे प्रतापराव जाधवांनी एकच खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, प्रतापराव जाधव यांना दिलेली जबाबदारी म्हणजे मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात देण्यात आलेलं पहिलं गिफ्ट असल्याची चर्चा रंगलीय. याआधी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचं अध्यक्षपद होतं. त्यांच्या जागी आता प्रतापराव जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलीय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.