‘कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच’, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर निशाणा, UPA अध्यक्षपदावरुन टोलेबाजी

| Updated on: Mar 30, 2022 | 10:48 PM

भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा दावा पाटील यांनी केलाय.

कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर निशाणा, UPA अध्यक्षपदावरुन टोलेबाजी
चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार (Sharad Pawar) यांना देण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीतील मेळाव्यात तसा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांना जोरदार टोला लगावलाय. यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधकांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा दावा पाटील यांनी केलाय. भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.

‘भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न’

यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावे, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याविषयी विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काही बोलणार नाही. पण भारतीय जनता पार्टी बूथपातळीपर्यंत भक्कम संघटनात्मक बांधणी करत आहे. त्याच्या जोरावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवू. मोदींची लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम आणि भाजपाची संघटनात्मक शक्ती यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जिंकतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.

‘आम्ही पक्ष संघटना मजबूत करतोय’

‘महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये विसंवाद’

चंद्रकांतदादा पुढे म्हणाले की, केवळ सत्तेसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे घटकपक्ष एकत्र राहिले असले तरी त्यांच्यातील विसंवाद सतत समोर येत आहे. काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या 25 आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निधी वाटपातील अन्यायाबद्दल पत्र लिहिले. प्रशासनाची वाताहत झाली आहे. अधिकारी दबावाखाली आहेत. त्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी तात्पुरत्या नेमणुकीवर केंद्र सरकारमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काहीजण शिष्यवृत्ती मिळवून प्रशिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या धडपडीत आहेत. या सगळ्यात जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. एसटीचा संप, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या सोडविल्या जात नाहीत, अशी टीका पाटील यांनी केलीय. तसंच भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. भाजपा ही निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

अजित पवारांवर निशाणा

इतर बातम्या :

नाणारला टोकाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेनं भूमिका का बदलली? नितेश राणेंचा सवाल, 7/12 तपासण्याचाही इशारा

स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, Anil Bonde यांचा शरद पवार यांच्यावर घणाघात