AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bavankule : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘मिशन 200 आणि 45’चा नारा; म्हणाले, जिंकणारच!

लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना मिळून 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असं धडधडीत विधान केलंय.

Chandrashekhar Bavankule : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मिशन 200 आणि 45'चा नारा; म्हणाले, जिंकणारच!
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मिशन 200 आणि 45'चा नारा; म्हणाले, जिंकणारच!Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 3:56 PM
Share

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून (Maharashtra BJP President) सस्पेन्स वाढला होता. मात्र आता राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. तसेच पक्षीय समीकरणेही बदलत आहेत. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्याकडे देण्यात आलंय आणि प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होताच बावनकुळेंनी त्यांचं लोकसभा आणि विधानसभेतलं टार्गेटही सांगून टाकलंय. लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना मिळून 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असं धडधडीत विधान केलंय. त्यामुळे आता बावनकुळे यांच्या या विधानांने विरोधकांनाही धडकी भरण्याची शक्यता आहे, बावकुळेंची पहिली प्रतक्रिया म्हणजे विरोधकांना इशाराच आहे.

मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांचे आभार

प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे म्हणाले, मी आज मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो. महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांचेही खऱ्या अर्थाने आज आभार मानतो, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली आणि या जबाबदारीतनं मला पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष हा जो नंबर एक पक्ष आमचा आहे, महाराष्ट्रामध्ये अजून नंबर एक कसा करता येईल, अजून त्याला आपल्या पक्षाला प्रचंड मोठं कसं करता येईल, हे पाहायचं आहे, असे म्हणत त्यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.

विधानसबेत दोनशे जागा जिंकण्याचं टार्गेट

भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये नंबर एक पक्ष म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड ताकतीने उभा करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. गावाच्या अध्यक्ष पासून ते महाराष्ट्र अध्यक्षांपर्यंत माझ्यावर पक्षाच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला, तो विश्वास मी पूर्ण करीन, तसेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना लोकसभेमध्ये 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल आणि महाराष्ट्रात दोनशे विधानसभा निवडून आणेल, अशी प्रतिक्रिया यावेळी बावनकुळेंनी दिलीय.

आशिष शेलर भाजप मुंबई अध्यक्ष

तर भाजप नेते आशिष शेलार यांच्या गळ्यात मुंबईच्या प्रदेशाध्यपदाची धुरा देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. गेल्या काही दिवसात मुंबईच्या अनेक भागात पोलखोल यात्रेच्या माध्यमातून शेलार हे शिवसेनेला वारंवार धारेवर धरत आहेत. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे. तर जातीय समीकरण आणि इतर बाबी लक्षात घेऊन बावनकुळेंकडे राज्याची धुरा सोपवण्यात आलीय.

ही बातमी वाचा:

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.