AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांच्या तक्रारी जागेवर सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा जनता दरबार

पालकमंत्री (Chandrashekhar Bawankule Wardha) येणार हे कळताच शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या नागरिकांच्या समस्या गाडीतून उतरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबरठ्यावर एकूण घेतल्या. त्यापैकी काहींचे निवारण करण्यात आले.

लोकांच्या तक्रारी जागेवर सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा जनता दरबार
| Edited By: | Updated on: Aug 31, 2019 | 9:25 PM
Share

वर्धा : विधानसभा निवडणूक जवळ येईल तशा जनतेच्या तक्रारी लोकप्रतिनिधींना दिसायला लागल्या आहेत. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule Wardha) यांनी पदभार सांभाळताच जनसंवाद जनता दरबार सुरू केला. पालकमंत्री (Chandrashekhar Bawankule Wardha) येणार हे कळताच शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या नागरिकांच्या समस्या गाडीतून उतरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबरठ्यावर एकूण घेतल्या. त्यापैकी काहींचे निवारण करण्यात आले.

गर्दी वाढलेली दिसल्यांनातर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी साधारण 150 पेक्षा जास्त तक्रारी आजही नोंदविण्यात आल्या.

जनतेच्या तक्रारी पहिल्याच पायरीवर सोडवल्या गेल्या तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे तक्रारी येण्याचे प्रमाण कमी होईल आणि जनतेला लवकर दिलासा देता येईल. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी रोज दोन तास राखीव ठेवावे, तक्रारी आपल्याच स्तरावर निकाली काढाव्यात, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

अगदी छोट्या-छोट्या तक्रारींसाठी लोकांनी पालकमंत्र्यांकडे येणे योग्य नाही. अधिकाऱ्यांच्या पातळीवर सदर तक्रारी सुटणे आवश्यक आहे. आलेल्या तक्रारींवर कोणताही मार्ग निघत नसल्यास संबंधित व्यक्तीला तसे लेखी कळविल्यास पुन्हा तक्रार घेऊन येणार नाही. तसेच तक्रारींचे निराकरण तात्काळ केल्यास नागरिकांना समाधान मिळेल, असंही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितलं.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.