
“मला हे कळत नाही रोज विलिनीकरण, विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरण आजही करता येईल. एक महिन्याने, दोन महिन्याने करता येईल. घाई करण्याचं कारण काय आहे?. सुनेत्रा पवार तिथे उपमुख्यमंत्री म्हणून बसलेल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत तसचं त्यांना वाटेल त्या नेत्यांना त्या बोलावतील. चर्चा होईल, एवढा मोठा निर्णय आहे. हा दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करुन होईल. त्या बद्दल इतकी घाई करण्याचं कारण नाही. आता ते ठरल होतं, हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम करुन द्या. समजून घेऊ द्या. मग बघतील काय करायचे ते” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते छगन भुजबळ विलिनीकरणांच्या चर्चांवर म्हणाले.
“त्यांनी त्या पदावर व्यवस्थित स्थिरस्थावर होणं. त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड होणं हा माझ्यासमोरचा प्राथमिक अजेंडा आहे” असं छगन भुजबळ म्हणाले. आपल्या पक्षातले आमदार विलिनीकरणाबद्दल मत व्यक्त करतायत, त्यावर “हे मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. नवीन कॅप्टन नेमलेत ते विचार करतील. मग बघू काय करायचं ते” असं छगन भुजबळ म्हणाले. “तीन-चार दिवसात शपथ घेतल्यानंतर घाई केली. मग, पहिल्या दिवसापासून विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे, ती घाई नाही का? रोज तीच,तीच बातमी” असं छगन भुजबळ म्हणाले.
ते सगळे बसून विचार करतील
खोसकर, झिरवळ दिल्लीला गेलेत. त्यावर “दिल्लीत मोदी, अमितभाईंना भेटायला गेलेत का?. मला माहिती नाही. त्यांच्या खात्याचं काही काम असेल म्हणून गेले असतील” “पक्ष संघटना म्हणजे काय? सगळे मिळून संघटना तयार होते, पक्ष बनतो. पक्ष म्हणजे बोर्ड आहे का? ऑफिस आहे का?. तिथे काम करणारे कार्यकर्ते मिळून संघटना, पक्ष तयार होतो. ते सगळे बसून विचार करतील” असं छगन भुजबळ म्हणाले.
शरद पवारांना फोन
सुनेत्रा ताईंनी शपथ विधी आधी शरद पवारांना फोन केला होता, अशी माहिती समोर येतेय. “फोन केला होता की नाही मला माहित नाही. पण जय, पार्थ तिथे जाऊन पवार कुटुंबियांना भेटून आले. ते सर्व टीव्हीवर चाललेलं ना हे आपण पाहिलं”