AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरचे खासदार गप्प का? नागरिक संतापले, 28 गावांच्या नजरा कर्नाटकच्या दिशेने…

लोकप्रतिनिधी आणि धर्मगुरू म्हणून त्यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठीही पुढाकार घेतलेला नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

सोलापुरचे खासदार गप्प का? नागरिक संतापले, 28 गावांच्या नजरा कर्नाटकच्या दिशेने...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 06, 2022 | 9:43 AM
Share

सोलापूरः सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीत (Grampanchayat) तसा ठराव घेण्यात आला. मात्र सोलापुरचे खासदार यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ज्या नागरिकांनी मतं दिल्याने मागील 8 वर्षांपासून हे खासदारकी भूषवत आहेत, त्यांच्या प्रश्नावर हे एवढा वेळ गप्प कसे बसू शकतात, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाहीये.

सामाजिक कार्यकर्ते राज सलगर म्हणाले, खासदार महोदय गेल्या तीन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्याही विषयावर बोलायला तयार नाहीत.

माध्यमांनाही बोलत नाहीत. ज्या तालुक्यात त्यांचा जन्म झाला, त्याच तालुक्यातील 28 गावंच कर्नाटकात जायला निघाली आहेत. म्हणजे जन्मभूमी आणि कर्मभूमीलाही तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत.

एकिकडे खासदार म्हणून तुम्ही अपयशी आहात तर दुसरीकडे धर्मगुरू म्हणूनही तुम्ही अपेक्षा पूर्ण करत नाहीयेत, असा आरोप राज सलगर यांनी केला.

सोलापूर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यात धर्मगुरू म्हणून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा मोठा भक्तगण आहे. लिंगायत समाजाचे ते धर्मगुरु आहेत.

पण आपल्या गावातील लोकांची त्यांनी साधी भेटही घेतली नाही. हे खासदार महोदयांचं खूप मोठं अपयश असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चिमणीचा प्रश्न पेटला आहे. लोकप्रतिनिधी आणि धर्मगुरू म्हणून त्यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठीही पुढाकार घेतलेला नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिक बोलायला गेल्यास ते म्हणतात, आम्ही संसदेत बोलतो. पण तिथंही ते गप्प असतात. 420 चा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला असून कोर्टाच्या चकरा मारण्यात त्यांचं आयुष्य चाललंय, अशी टीका नागरिकांनी केली.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....