AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्ह्याची जबाबदारी, पालकमंत्र्यांनी नेमकं कुठं लक्ष द्यायचं?, राष्ट्रवादी पक्षाचा खोचक टोला

फडणवीस, शिंदे सरकारमध्ये अनेक आमदारांनी मंत्रिपदाची मागणी केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

एका मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्ह्याची जबाबदारी, पालकमंत्र्यांनी नेमकं कुठं लक्ष द्यायचं?, राष्ट्रवादी पक्षाचा खोचक टोला
| Updated on: Oct 15, 2022 | 10:20 AM
Share

मुंबई :  भाजप (BJP), शिंदे (Shinde) सरकारबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिंदे गटात ठाकरे गटातून जेवढे काही आमदार गेले ते सर्व आमदार मंत्रिपदाची मागणी करत आहेत. त्यामुळे शिंदे – भाजप सरकार टिकणं मुश्किल असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. सध्या 145 आमदारांचं संख्याबळ आहे, तोपर्यंत काही धोका नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकी परिस्थिती समोर येईल. आमदारांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं अवघड असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पालकमंत्री पदावरून टोला

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पालकमंत्री पदाच्या वाटपावरून देखील शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. जिल्ह्यातील लोकांच्या काय समस्या आहेत. जिल्ह्यात काही विकास काम बाकी आहेत का हे पहाणं तिथल्या पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. मत्र सध्याच्या सरकारमध्ये एकाच मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्हांचा कारभार देण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये ते प्रत्येक जिल्ह्यावर कसं लक्ष देणार असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवारांची टोलेबाजी

दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर टीका करताना जोरदार टोलेबाजी केली आहे. सध्या 145 आमदारांचे संख्याबळ आहे, तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नेमकी परिस्थिती बाहेर येईल. आमदारांना जी अश्वासने देण्यात आली आहेत, ती जर पूर्व नाही झाली तर परिस्थिती गंभीर बनले असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.