AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

राज्यपालांनी एकनाथ शिंदे सरकारला शनिवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या बहुमत चाचणीकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 30, 2022 | 9:20 PM
Share

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून आजच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शपथ घेतली आहे. या नव्या सरकारची येत्या शनिवारी अग्निपरीक्षा असणार आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे सरकारला शनिवारी बहुमत सिद्ध करण्याचे (Floor Test) आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या बहुमत चाचणीकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या शनिवारी विधानसभेचं हे विषेश अधिवेशन आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडही येत्या शनिवारीच आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा येणारा शनिवार हा मोठा ठरणार आहे. आम्ही राहिलेली कामं पुढे घेऊन जाणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांनाही चालना देण्याचा निर्णय झालेला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वांत विकास हाच आमचा उद्देश आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर आजच त्यांनी पदभारही स्वीकारला आहे.

सरकार अग्निपरीक्षा सहज पार करणार

कुठल्याही सरकारला अस्तिावत आल्यानंतर आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं. तसेच या सरकारलाही बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. उद्धव ठाकरे सरकार आपले बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानेच हे सरकार अस्तित्वात आले आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड हे ठाकरे सरकारला घेऊन डुबलं आहे. त्यामुळे राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आहे. याही सरकारला आपलं बहुमत हे सिद्ध करावेच लागणार आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांचं आकडा पहिल्यास या सरकारला बहुमत सिद्ध करणे खूप कठीण जाईल, असे वाटत नाही. त्यामुळे नवे सरकार ही सुद्धा अग्निपरीक्षा सहज पार करेल असा विश्वास आता भाजप नेत्यांकडूनही व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.