AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde vs Shiv sena : तुम्ही आरती केली तर आम्ही पण करणार, शिंदे गटाने गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटही उद्या आरती करणार

ही चढाओढ आता गणपती मंदिरापर्यंत जाऊन पोहोचली आहे. कारण शिंदे गटांकडून गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटाकडून उद्या पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात आरती केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Cm Eknath Shinde vs Shiv sena : तुम्ही आरती केली तर आम्ही पण करणार, शिंदे गटाने गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटही उद्या आरती करणार
तुम्ही आरती केली तर आम्ही पण करणार, शिंदे गटाने गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटही उद्या आरती करणारImage Credit source: tv9
| Updated on: Jul 25, 2022 | 7:58 PM
Share

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडाने आधी शिवसेनेत (Shiv sena MLA) उभे फूट पडली. राज्यातलं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पत्त्याच्या डावासारखं कोसळलं आणि राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं नवं सरकार स्थापन झालं. मात्र यांना या नव्या सरकारची स्थापना झाल्यापासून प्रत्येक गोष्टीत चढाओढ दिसत आहे. सुरुवातीलाच शिंदे सरकारने ठाकरे सरकारने काढलेल्या सर्व  निविदांना स्थगिती दिली. तसेच यां निविदांची पुन्हा पडताळणी करून पुन्हा नवे निर्णय करण्यास सुरुवात केली. हा वाद फक्त मंत्रालयाच्या चौकटीपुरता आणि निर्णयानपुरताच मर्यादित राहिला नाही. तर ही चढाओढ आता गणपती मंदिरापर्यंत जाऊन पोहोचली आहे. कारण शिंदे गटांकडून गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटाकडून उद्या पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात आरती केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

ठाकरे गट उद्याच आरती करणार

पुण्यातलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणाहून या ठिकाणी भाविक आरती करण्यासाठी येत असतात. पुण्यात आता दगडूशेठ गणपतीच्या महाआरतीवरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांचा गट यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती करण्याचे शिंदे गटाने जाहीर करतात, आता शिवसेने कडून दगडूशेठ गणपतीचे महाआरती करण्यात येणार आहे. त्यासाठी एक ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात येणार आहे, तर शिवसेना पदाधिकारी उद्या सकाळी दहा वाजता महाआरती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळेस सेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाआरती पार पडणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.

ठाकरे गटाचं आरतीबाबत स्पष्टीकरण

दरम्यान उद्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणाऱ्या आरतीचा 1 ऑगस्टच्या आरतीशी काही संबंध नाही. दरवर्षी निलम गोऱ्हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गणपतीला मोदक अर्पण करून आरती करतात. उद्या होणारी आरती ही राजकीय नाही आणि त्याचा 1 ऑगस्टच्या आरतीशी संबंध नाही. अशी माहिती निलम गोऱ्हे यांनी उद्याच्या कार्यक्रमाबाबत दिली आहे.

धार्मिक राजकारणही वाढलं

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतानाच सर्वात प्रमुख कारण सांगितलं ते म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराशी घेतलेली फारकत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती करायला लागली तर मी माझं दुकान बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, असे सांगत शिंदे हे या दोन्ही पक्षांपासून वेगळे झाले आणि हिंदुत्वाचे विचारधारा उचलून धरणाऱ्या भाजपसोबत त्यांनी वेगळी चूल मांडली. त्यामुळे राजकारणात धर्म हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे. तसेच धार्मिक विचारधारा आणि हे राजकारण आता मंदिरांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे आता या महाआरतीची राज्यभर चर्चा सुरू आहे. या महाआरतीवरून पुण्याच्या राजकारणात सध्या तणाव निर्माण झाला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.