AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित देशमुख यांचा शायराना अंदाज; म्हणाले, ‘मुझको राणाजी माफ करना गलती…’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी तुळजापूरमध्ये एका सभेत गाण्याच्या माध्यमातून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. देशमुख यांनी त्यांच्या गाण्यामधून पाटील यांच्या राजकीय भूमिकेवर वार केले आणि काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचाराच्या पद्धतीमुळे निवडणुकीला अधिक रंगत आली आहे. देशमुख यांच्या या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अमित देशमुख यांचा शायराना अंदाज; म्हणाले, 'मुझको राणाजी माफ करना गलती...'
अमित देशमुख यांचा शायराना अंदाज
| Updated on: Nov 07, 2024 | 6:38 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला रंगत येत आहे. कारण प्रचारांचा तोफा सुरु झाल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहेत. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी, खिल्ली उडवण्याच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राजकारणात या गोष्टी होणं साहजिकच आहे. कारण या वेळची विधानसभा निवडणूक वेगळी आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात राजकारणात प्रचंड उलथापालथ झाले आहेत. दोन पक्षांत उभी फूट पडली आहे. त्यामुळे दोन पक्षांचे रुपांतर आता चार पक्षांमध्ये झाले आहेत. तसेच भाजप आणि काँग्रेस हे पक्षदेखील आहेत. त्या पक्षांमधील अंतर्गत कलह आणि गटबाजीसुद्धा आहे. बंडखोरी देखील आहे. यामुळे या निवडणुकीत प्रचंड ट्विस्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाचं या निवडणुकीच्या घडामोडींकडे बारकारईने लक्ष आहे. असं असताना आज तुळजापुरात काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी गाण्याचे सूर छेडत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला.

अमित देशमुख नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी तुळजापूरमधील प्रचारसभेत गाणी म्हणत राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली. “लोकसभेला घड्याळ घेऊन उभे होते. आता कमळ घेऊन उभे आहेत. त्यामुळे लोक आता म्हणत आहेत पाटील गावाकडे चला”, असा टोला अमित देशमुख यांनी लगावला. “यावेळी ते मत मागायला आले की तुम्ही त्यांना म्हणा, मुझको राणाजी माफ करना गलती थारेसे हो गई”, असं गाणं म्हणत अमित देशमुख यांनी राणा पाटील यांच्यावर टीका केली.

“स्वर्गीय विलासराव देशमुख की बात पर शरदचंद्र पवार की बात पर उद्धव ठाकरे की बात पर मत देना काँग्रेस के हातपर”, असे यमक जुळवून देशमुख यांनी तुळजापूरमधील उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले. अमित देशमुख धीरज पाटील यांच्या सभेसाठी तुळजापुरात आले असताना जाहीर सभेतच त्यांनी गाणे आणि शायरी म्हणत भाजपवर टीका केली. त्यामुळे उपस्थित लोकांना काही काळ विलासराव देशमुख यांची आठवण आल्याचा प्रत्यय येत होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.