AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल होताच काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा

पणजी : काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने त्याबाबतचं पत्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिलं. भाजपने संख्याबळ गमावल्याने सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केलाय. पर्रिकर कॅन्सरशी लढत आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार केले जात असून ते मुख्यमंत्री म्हणून […]

मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल होताच काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

पणजी : काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने त्याबाबतचं पत्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिलं. भाजपने संख्याबळ गमावल्याने सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केलाय. पर्रिकर कॅन्सरशी लढत आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार केले जात असून ते मुख्यमंत्री म्हणून कामकाजही पाहत आहेत.

आमदार फ्रान्सिस डिसूझा यांच्या निधनाने भाजपकडे 13 आमदारांचं संख्याबळ उरलं आहे, मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. अशावेळी जे सरकार अल्पमतात आहे, त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करुन सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी द्यावी असं काँग्रेसने म्हटलं आहे.

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांचं नुकतंच निधन झालं होतं. 64 वर्षीय डिसूझा कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु होते. ते आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये गेले होते. त्यांनी 2002,2007,2012 आणि 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2012 मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.

दरम्यान, 40 सदस्यीय गोवा विधानसभेसाठी 2017 मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेस  14 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 13 जागी विजय मिळाला. मात्र अन्य पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीला 3, गोवा फॉर्वर्ड पक्षाला 3 आणि अपक्ष 3 या सर्वांनी मिळून भाजपला पाठिंबा दिल्याने इथे युतीचं सरकार बनलं.

यापूर्वीही काँग्रेसची मागणी

दरम्यान, काँग्रेसने सर्वात मोठा पक्ष ठरल्याने सत्तास्थापनेचा दावा सर्वात आधी केला होता. मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही. मग मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर गोवा,मुंबई आणि अमेरिकेत उपचार सुरु असल्याने, काँग्रेसने राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी विनंती केली होती.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली