AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात

राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे.

दत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात
दत्तात्रय भरणेंची अपघातग्रस्ताला मदत
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 05, 2021 | 1:04 PM
Share

पुणे: राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. दत्तात्रय भरणे काल त्यांचा विधानसभा मतदारसंघ इंदापूरच्या (Indapur) दौऱ्यावर होते. काल रात्री राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरहून जात असताना त्यांच्या समोर इंदापूर बारामती (Indapur Barmati Road) रस्त्यावर एका दुचाकी स्वार आणि टेंपोचा अपघात झाला. अपघात झाल्याचं समजताच दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. अपघातात जखमी झालेल्यांची चौकशी करून त्याला ताफ्यातील पोलिसांच्या गाडीत बसवून रुग्णालयात पाठवून दिलं.

दत्तात्रय भरणे यांच्याकडून माणुसकीचं दर्शन

इंदापूर बारामती रस्त्यावर अपघात झाल्याचं पाहून दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. राज्यमंत्री भरणे, त्यांचा स्वीय सहायक आणि पोलीस अधिकारी यांनी अपघातग्रस्ताला मदत केली. अपघात ग्रस्ताला पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. अपघातात जखमी झालेल्या युवकाला पोलिसांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. दत्तात्रय भरणे आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी अपघातग्रस्ताला दिलेला धीर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे नेहमीच अपघात ग्रस्तांना मदत करताना दिसून येतात. नोव्हेंबर महिन्यातही अपघात झाल्याचं दिसताच ताफा भरणे यांनी ताफा थांबवला होता. राज्यमंत्री भरणे यांनी त्यावेळी अपघातग्रस्ताची विचारपूस करत धीर दिला होता.महामार्गावर झालेला अपघात पाहताच भरणे यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली होती.

इंदापूर तालुक्यातील भिगवन येथील कार्यक्रमातून इंदापूरकडे परतत असताना पुणे- सोलापूर महामार्गावरती लोणी देवकर या ठिकाणी एका कारचा अपघात झाला होता. ती कार रस्ता सोडून समोरच्या दुभाजकावर गेली, यावेळी भरणे यांनी त्यांचा ताफा ताबडतोब थांबवून तातडीने जखमींकडे धाव घेतली होती. या अपघातग्रस्तांना धीर देत, त्याची विचारपूस करीत आपल्या गाडीतील पिण्याचे पाणी त्यांना दिले होते.

इतर बातम्या :

Nagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली

Nashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल?

Dattatray Bharane help injured person in accident at Indapur Baramati Road

Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ