AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : मी खरं बोलतोय म्हणून तपास यंत्रणामागे लावल्या, देशात रोज लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक माणूस या संस्थांमध्ये बसलेला आहे. देशातील या संवैधानिक संस्थांवर आरएसएसचा कब्जा आहे, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीत कलम 144 लागू केलं आहे. तसेच काँग्रेसला दिल्लीत निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Rahul Gandhi : मी खरं बोलतोय म्हणून तपास यंत्रणामागे लावल्या, देशात रोज लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचा हल्लाबोल
मी खरं बोलतोय म्हणून तपास यंत्रणामागे लावल्या, देशात रोज लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2022 | 11:27 AM
Share

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर (central government) हल्ला चढवला आहे. देशात आज लोकशाही शिल्लक राहिलीच नाही. रोज लोकशाहीची हत्या होत आहे. सध्या महागाई आणि बेरोजगारीवर कोणीच बोलत नाही. बोलणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. मी खरं बोलतोय म्हणून आमच्या मागे तपास यंत्रणा लावल्या आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (rss) टीका केली. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी आणि वस्तुंवरील वाढवलेल्या जीएसटीच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू केली आहे. काँग्रेसकडून आज पंतप्रधानाच्या निवासालाही घेराव घातला जाणार आहे. तर महाराष्ट्रात काँग्रेसकडून राजभवनाला घेराव घातला जाणार आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला आहे.

देशातील 70 वर्ष सुरू असलेली लोकशाही या सरकारने 8 वर्षात संपुष्टात आणली आहे. देशात सध्या चार लोकांची हुकूमशाही सुरू आहे. संसदेत आवश्यक मुद्द्यांवर चर्चा होत नाहीये. महागाई आणि बेरोजगारीवरही बोलू दिलं जात नाही. आपण काही संस्थांना स्वतंत्र ठेवत असतो. पण केंद्र सरकारच्या विरोधात काही बोललं तर सीबीआय आणि ईडी लावल्या जात आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक माणूस या संस्थांमध्ये बसलेला आहे. देशातील या संवैधानिक संस्थांवर आरएसएसचा कब्जा आहे, असा दावाही त्यांनी केला.

केंद्र सरकार खोटारडं

सर्वाधिक बेरोजगारी भारतात आहे. भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र या गोष्टी अर्थ मंत्र्यांना दिसत नाहीये. कोणत्याही गावात आणि शहरात जा. लोकच तुम्हाला महागाई वाढल्याचं सांगतील. पण सरकारला ही महागाई दिसत नाहीये. सरकार महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहे. हे लोक जनतेच्या शक्तीला घाबरत आहेत. कारण हे लोक खोटारडे आहेत. खोटे बोलत आहेत. देशात महागाई नाही, बेरोजगारी नाही, असं हे लोक खोटं सांगत आहेत. चीनने घुसखोरी केली नाही हे सुद्धा खोटं सांगितलं जात आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

आंदोलनाला परवानगी नाकारली

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीत कलम 144 लागू केलं आहे. तसेच काँग्रेसला दिल्लीत निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. आम्ही काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांना पत्र लिहिलं आहे. त्यांना राज्यात कलम 144 लागू करण्यात आल्याने तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. तसेच तुम्हाला आंदोलन करण्याची परवानगी दिली जात नाहीये, असंही बजावल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी