AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepak Kesarkar : लोकांना का भडकवताय?; दीपक केसरकरांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Deepak Kesarkar : खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार कुणी दिला? खासदारांच्या घरावर मोर्चे काढायला लावता. लोकांना का भडकवता का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता केला. आजारी असताना कटकारस्थान झाले नाही.

Deepak Kesarkar : लोकांना का भडकवताय?; दीपक केसरकरांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला दीपक केसरकरांची हजेरी, शरद पवारांना सल्ला Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 5:03 PM
Share

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलणार नाही. त्यांच्यावर टीकाही करणार नाही, असं शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. मात्र, आता या आमदारांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तर थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. खासदारांच्या घरावर मोर्चे काढले जात आहेत. त्यांना जाब विचारले जात आहेत. लोकांना का भडकवताय? असा सवाल दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. केसरकर यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. त्यामुळे दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे.

मी तीन प्रश्न विचारले होते. त्यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला नाही. केंद्राशी चांगले संबंध राहिले असते तर विकासाला चालना मिळाली असती. पण रोज सकाळी 9 वाजता उठायचे आणि केंद्रावर टीका करायची हेच धोरण राबवलं गेलं. त्यामुळे केंद्राशी संबंध चांगले राहिले नाही, अशी टीका करतानाच गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होतं. दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबलं पाहिजे, असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं.

कालपर्यंत न फिरणारे आता फिरत आहेत

खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार कुणी दिला? खासदारांच्या घरावर मोर्चे काढायला लावता. लोकांना का भडकवता का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता केला. आजारी असताना कटकारस्थान झाले नाही. आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली म्हणजे कटकारस्थान नाही. कालपर्यंत न फिरणारे आता फिरू लागलेत. सातव्या मजल्यावरील ऑफिसात कितीवेळा गेलात? व काय काम केलेत? बांधावर जा म्हणून सांगायचे, मग आता कार्यकर्त्यांना सांगून बांधावर जायला का सांगत नाहीत? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेता केला.

प्रवक्ते पुन्हा एकदा सुरू झाले

त्यांच्या प्रक्त्यांची भाषा मधल्या काळात सौम्य झाली होती. आता पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. लोकांना खोटं सांगून रडवत आहेत. कशासाठी हे? असा सवाल करतानाच आता जे युवासेना प्रमुख आहेत. ते शाखा शाखांमध्ये फिरताहेत. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण हे लोक आधी कुठे होते? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार