AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी रामदास आठवले घराण्याचा…कवितांचा संदर्भ येताच फडणवीसांचं खास विधान; असं का म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी केलेल्या कविता, रचलेली गितं याबाबात दिलखुलासपणे सांगितंल आहे.

मी रामदास आठवले घराण्याचा...कवितांचा संदर्भ येताच फडणवीसांचं खास विधान; असं का म्हणाले?
devendra fadnavis and ramdas athawale
Updated on: Jun 21, 2025 | 6:42 PM
Share

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाच रेडिओ जॉकींनी एक मुलाखत घेतली. ही मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. कारण फडणवीस यांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिलखुलासपणे दिली आहेत. या मुलाखतीत त्यांनी लिहिलेल्या कविता, गीतांबद्दल विचारण्यात आलं. केलेल्या मॉडेलिंगबद्दलही फडणवीस यांनी बरीच माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या कवितांविषयी सांगताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं नाव घेत मिश्किल भाष्य केलं.

नंतर मॉडेलिंगची मी कधीही हिंमत केली नाही

देवेंद्र फडणवीस यांनी कधीकाळी मॉडेलिंग केलेलं आहे. त्यांचे काही फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. सोबतच फडणवीस हे कवी, गीतकार आहेत. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर मॉडलिंग हा अपघात होता. मित्रांनी केलेला प्रँक होता. पण नंतर मॉडेलिंगची मी कधीही हिंमत केली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी मॉडलिंग गाजली कारण, कुत्रा माणसाला चावला तर बातमी नसते माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

मी रामावर गाणं लिहिलं, मी…

कविता आणि गीत लिहण्याच्या आवडीविषयीही त्यांनी बरंच काही सांगितलं. राम जन्मभूमीवेळी मी रामावर गाणं लिहिलं. शंकरावर गाण लिहिलंय. शंकर महादेवन यांनी ते गाणं गायलं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच मी आणखी एक गाणं लिहिलेलं आहे. पण त्याचा शोध तुम्हीच घ्या, असंही ते म्हणाले.

तसा मी रामदास आठवले…

लिहिलेल्या कवितांबद्दल बोलताना फडणवीस यांनी रामदास आठवले यांचे नाव घेतले. तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे, असं फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. तसेच त्यांनी तुम्ही आहात आरजे तुम्हाला एत नाही फारसे, बाहेर लावलेत, अशी एक शीघ्रकविताही केली. पुढे त्यांनी लिहिलेली एक कविताही त्यांनी म्हणून दाखवली.

आशिष शेलार काय म्हणाले?

या कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार यांनीही अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. अगोदर दुसरे कोणतेही माध्यम नव्हते. तेव्हापासून आतापर्यंत सांस्कृतिक परंपरेचे काम जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम रेडिओने केले. आता यात अनेक बदल झाले. हे मोठे मध्यम आहे. म्हणून त्यांना सन्मानित केलं पाहिजे. त्यांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून देशात पहिल्यांदा आपल्या राज्याने आशाताई यांच्या नावाने पुरस्कार दिला, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. आशाताईंचे आभार मानावे एवढा मोठा मी नाही. आम्ही त्यांचे गाणे ऐकत मोठे झालो, अशी भावनाही शेलार यांनी व्यक्त केली.

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर.
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत....
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर.
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्....
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं...
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं....
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्..
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्...
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?.
राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू
राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू.