AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी हा पक्ष सोडला का? छगन भुजबळ यांनी काय दिले उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. पण त्यांच्या नेतृत्वात मजबुतीने काम सुरु आहे, हे सत्य नाकारता येत नाही, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. आपण शिवसेना-भाजपसोबत का आलो, हे ही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी हा पक्ष सोडला का? छगन भुजबळ यांनी काय दिले उत्तर
| Updated on: Jul 02, 2023 | 4:58 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या भूकंपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अन् छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदेत बोलताना भुजबल यांना म्हटले की, अजित पवार यांच्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आहोत. तसेच महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. काही जणांचा गैरसमज आहे की, आम्ही पक्ष सोडलाय. तर तसं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सामील झालो आहोत. आम्ही सर्वांनी जो निर्णय घेतलाय, तो शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी घेतला, असा दावा राज्याचे नवनिर्विचित मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

ओबीसींचे प्रश्न सोडवणार

अजित पवार यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, आपणास सकारात्मक विचाराने काम करणं गरजेचे आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. पण त्यांच्या नेतृत्वात मजबुतीने काम सुरु आहे, हे सत्य नाकारता येत नाही. विकासाच्या नावाने चांगले काम सुरु आहे. ओबीसींचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय पर्याय नाहीत.

विरोधकांची बैठक

पाटण्यात नुकतीच देशभरातील विरोधकांची बैठक झाली. या बैठकीनंतर एकमेकांवर रागावणं सुरु आहे. शरद पवार यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं की, येत्या २०२४ निवडणुकीत देशात मोदी सरकारच येणार आहे. त्यामुळे आम्ही सरकारला मदत केली पाहिजे. उगाच भांडण करुन प्रश्न सुटणार नाहीत. याउलट शासनात जाऊन प्रश्न मिटवले पाहिजेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

Follow Us
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.