AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंधळात गोंधळ! चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं डिलीट!

शिमला : हिमाचल प्रदेशात लोकसभा मतदानादरम्यान अजब प्रकार घडला आहे. मतदानादिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं (मॉक पोल) डिलीट करण्यास निवडणूक अधिकारी विसरले. धक्कादायक म्हणजे हा प्रकार जेव्हा त्यांच्या लक्षात आला तेव्हा खरी मतं डिलीट केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी 20 अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रविवारी 19 मे रोजी हा प्रकार घडला. याबाबत हिमाचलचे […]

गोंधळात गोंधळ! चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं डिलीट!
| Updated on: May 22, 2019 | 11:08 AM
Share

शिमला : हिमाचल प्रदेशात लोकसभा मतदानादरम्यान अजब प्रकार घडला आहे. मतदानादिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं (मॉक पोल) डिलीट करण्यास निवडणूक अधिकारी विसरले. धक्कादायक म्हणजे हा प्रकार जेव्हा त्यांच्या लक्षात आला तेव्हा खरी मतं डिलीट केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी 20 अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रविवारी 19 मे रोजी हा प्रकार घडला.

याबाबत हिमाचलचे मुख्य निवडणूक आयुक्त देवेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. पाच पिठासीन अधिकारी आणि 15 निवडणूक अधिकाऱ्यांचं निलंबन होण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्ष मतदानाच्या तासाभरापूर्वी ईव्हीएम सुरळीत आहेत का, जे बटण दाबलं जातं त्याच उमेदवाराला मत जातं का, काही तांत्रिक बिघाड तर नाही ना, हे तपासण्यासाठी चाचणी मतदान घेतलं जातं. जवळपास 50 मतं ईव्हीएमवर करुन पाहिली जातात. यावेळी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचे प्रतिनिधीही हजर असतात. मतदान योग्य होत असल्याची खात्री पटल्यानंतर चाचणीसाठी घेतलेली मतं ईव्हीएमवरुन डिलीट केली जातात.

देशभरात कोणत्याही मतदानापूर्वी असेच मॉक पोलिंग केलं जातं. हिमाचल प्रदेशातही ही प्रक्रिया केली, मात्र चाचणीसाठी घेतलेली मतं डिलीट करण्यास अधिकारी विसरले आणि हा सर्व गोंधळात गोंधळ झाला.

याबाबत देवेश कुमार म्हणाले, “हिमाचलमध्ये शेवटच्या टप्प्यात रविवारी मतदान झालं. यावेळी चाचणीसाठी घेतलेली मतं डिलीट करण्यास 20 अधिकारी विसरले. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानात ही मतं जमा झाली. ही चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष झालेल्या मतदानातील मतं डिलीट करुन आकड्याचं गणित जुळवण्याचा प्रयत्न केला”

हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी, हमीरपूर आणि कांग्रा या लोकसभा मतदारसंघात 19 मे रोजी मतदान झालं.  त्यादरम्यान हा प्रकार घडला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.