मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता राजस्थानातही शेतकरी कर्जमाफी

जयपूर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर आता राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारनेही शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. राजस्थान सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ट्वीट करत या निर्णयाची माहिती दिली. ‘काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आमच्या सरकारने शेतकरी कर्ज माफी करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस जे बोलते ते करुन […]

मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता राजस्थानातही शेतकरी कर्जमाफी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

जयपूर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर आता राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारनेही शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. राजस्थान सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ट्वीट करत या निर्णयाची माहिती दिली. ‘काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आमच्या सरकारने शेतकरी कर्ज माफी करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस जे बोलते ते करुन दाखवते’, असे सचिन पायलट यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत घेतलेल्या दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला मागे सारत 199 पैकी 99 जागांवर विजयी ठरली. त्यानंतर राहुल गांधी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची धुरा अशोक गहलोत यांच्याकडे सोपवली, तर सचिन पायलट यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री पद देण्यात आले.

काँग्रेसने राजस्थान विधानसभा निवडणूक ही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर लढवली. यामध्ये जर आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊ, असे राहुल गांधींनी आपल्या प्रत्येक प्रचार सभे दरम्यान सांगितले. त्यांच्या या आश्वासनाला काँग्रेसने प्रत्यक्षात उतरवले आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर आता राजस्थानमध्येही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं.

याआधी मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकार आणि छत्तीसगडच्या बघेल सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.