AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मविआ’ला समर्थन दिल्याचे वाईट वाटतं; औरंगाबादचं नाव बदलून काय संदेश दिला, अबू आझमींचा सवाल

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून अबू आझमी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. नाव बदलून काय संदेश द्यायचा आहे? असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला आहे.

'मविआ'ला समर्थन दिल्याचे वाईट वाटतं; औरंगाबादचं नाव बदलून काय संदेश दिला, अबू आझमींचा सवाल
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 03, 2022 | 1:57 PM
Share

मुंबई : आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडली. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे विधानसभेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठारावावेळी बोलताना अबू आझमी (Abu Azmi) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा अध्यक्षपद राज्यपालांनी अडवून धरलं होतं, हे पद बहुमतापेक्षाही घटनेनं चालणं गरजेचे आहे. मात्र तसे होऊ शकले नाही. मोठे पक्ष आपली कामं बरोबर करवून घेतात, पण छोट्या पक्षांची अवस्था वाईट आहे. त्यांना साधी बोलण्याची संधी देखील मिळत नाही.  आम्ही बोलायला उभे राहिलो की दोन मिनिटांत घंटी वाजवली जाते अशी खंत आझमी यांनी व्यक्त केली आहे. सोबतच त्यांनी नामांतराच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला. महाविकास आघाडीला समर्थन दिल्याचे वाईट वाटते असे आझमी यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले आझमी

उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला. नामांतराच्या मुद्यावरून अबू आझमी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. औरंगाबादचं नाव बदलून तुम्हाला काय संदेश द्यायचाय असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिले याचे वाईट वाटत असल्याचे आझमी यांनी म्हटले आहे. जुन्या शहरांचे नाव बदलून काय फरक पडणार आहे. जर तुम्ही एखादे नवे शहर वसवले असते तर गोष्ट वेगळी होती असे आझमी यांनी म्हटले आहे. दरम्यान अबू आझमी यांचे भाषण सुरू असतानाच अभिनंदन ठरावावर बोलावं असे आवाहन त्यांना विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आले.

आम्हाला बोलण्याची संधीही मिळत नाही

विधान भवनात छोट्या पक्षांची अवस्था वाईट असते, मोठे पक्ष आपली कामं बरोबर करवून घेतात. छोट्या पक्षांना साधी बोलण्याची संधी देखील दिली जात नाही. आम्ही बोलायला उभे राहिलो की दोन मिनिटांत घंटी वाजवली जाते अशी खंतही यावेळी आझमी यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...