AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांचे आज (28 जुलै) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन
| Updated on: Jul 28, 2019 | 11:55 AM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांचे आज (28 जुलै) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

एस.जयपाल रेड्डी हे गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनिया आजाराने ग्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

जयपाल रेड्डी यांचा अल्पपरिचय

जयपाल रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 रोजी तेलंगणा येथील माडगूळ गावात झाला. काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. जयपाल रेड्डी हे आंधप्रदेशातून 4 वेळा आमदार आणि 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत.

आणीबाणीच्या काळात त्यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारले. त्यानंतर काही काळ त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी जनता दलात प्रवेश केला. 1985 ते 1988 या काळात जनता दलाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा घरवापसी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात रेड्डी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना 1998 मध्ये उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Follow Us
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...